रावसाहेब दानवेंना लाथा मारणाऱ्यास एक लाखाचे बक्षिस – डाॅ.अजयराव तुमसरे

0
17

साकोली, दि.12- सत्तेची हवा डोक्यात शिरली की, मोठमोठी माणसे वेड्यासारखी बडबडायला लागतात. अशा पागल लोकांची संख्या सध्या भाजपमधे वाढत आहे. परिचारक, मुक्ता टिळक, दानवे यांच्यासारख्या विकृत लोकांची भाजपमध्ये उणीव नाही. मुख्यमंत्र्यांचा यांचेवर वचक नसल्यामुळे या बोलघेवड्यांचा दिवसेंदिवस तोल सुटत चालला आहे. दानवे शेतकऱ्यांना लाखोली वाहायला लागले. शेतकऱ्याच्या अस्मितेशी खेळणाऱ्या रावसाहेब दानवे यांना लाथा मारणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस दिले जाईल, असे वक्तव्य डॉ. अजयराव तुमसरे यांनी नुकतेच केले आहे.

देशात सर्वत्र भाजपचा विजय रथ सैराट धावत असल्याने भाजप नेत्यांच्या डोक्यात हवा शिरली आहे. परिणामी,  सैनिक आणि शेतकरी हे सुद्धा आता या सत्तांधांसाठी चेष्टेचे आणि टिंगल टवाळीचे विषय झाले आहेत. मागे काही दिवसापूर्वी भाजपच्या परिचारक याने सैनिक पत्नींच्या चारित्र्यावर संशय घेऊन देशासाठी लढणा-या जवानांचा  जाहीर अपमान केला होता. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शेतकऱ्यांच्या अब्रुवर हात टाकत  शिव्यांची लाखोली वाहने सुरू केले. दानवे साहेब,कोणाला ‘साले’ म्हणता ? ज्यांच्या भरवशावर तुम्हाला खासदारकी, पोराला आमदारकी,जावयाला आमदारकी,मुलीला जि.प.सदस्यत्व मिळाले ,त्या शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणता ! इतकी सत्तेची मस्ती ! इतका पदाचा माज ! कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आत्महत्या करणार नाही याची हमी मागता ? शेतमालाला योग्य भाव मिळेल,त्याचा माल वेळेवर आणि योग्य दरात खरेदी केला जाईल याची हमी घेता का ? एखाद्या शेतकऱ्याने जर तुम्हाला म्हटले की,साल्या ,मुलाच्या लग्नात खर्च केलेले कोट्यावधी रुपये कोठून आणले ? एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीने विचारले की,का रे साल्या,सगळी सत्तेची पदे तुझ्या एकट्याच्याच घरात कशी ? एखाद्या संतापलेल्या शेतक-याने जर विचारले की,साल्या तुरीचे पैसे काय तुझ्या घरातून दिले काय ? तर काय उत्तर आहे तुमच्याजवळ ! दानवे साहेब,भाजपमधे तुमची काय लायकी आहे हे आम्हाला त्याच दिवशी लक्षात आले होते की,ज्या दिवशी तुमचे मंत्रीपद काढून घेवून प्रदेशाध्यक्ष पदावर ‘डिमोशन’ करण्यात आले होते.आता शेतकऱ्यांनी अजिबात शांत बसू नये.दानवे जेथे दिसेल तेथे त्याला अडवा,घेराव घाला,गाडीतून खाली उतरवा,उतरत नसेल तर जबरदस्तीने खाली ओढा आणि त्याला विचारा की आम्ही तुझे कोणते घोडे मारले? का आम्हाला शिवीगाळ करुन आमच्या कष्टाचा,श्रमाचा अपमान करतोस? बुवा,बापू,अम्मा,दिदीच्या तथाकथित प्रवचनाला गर्दी करण्यापेक्षा दानवे जेथे दिसेल तेथे गर्दी करुन त्याला सळो की पळो करुन सोडा.त्याची भाषणे बंद पाडून आधी आमचा अपमान का केला याचे उत्तर त्याला मागा.तरच शेतकऱ्यांबद्दल अशी बेताल वक्तव्ये करण्याची यानंतर कोणाची हिंमत होणार नाही. म्हणून शांत बसू नका,पेटून उठा,आत्महत्या केल्यापेक्षा आपले शोषण करणारे दोन चार मंत्री,मोठे अधिकारी यांना चोप देवून शेतकऱ्यांची दहशत निर्माण करा. तरच कोणी आपल्याला साले म्हणणार नाही. आणि जो व्यक्ती दानवे यांना पायाखाली तुडवेल त्याला एक लाख रूपये बक्षीस देणार, असेही डॉ. तुमसरे यांनी म्हटले आहे.