” जीवन गौरव ” पुरस्कारासाठी शिक्षकांना प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन   

0
35

औरंगाबाद,(प्रतिनिधी),दि.23ः- बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक  मासिकाच्या चौथ्या  वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शिक्षक बंधू- भगिनीसाठी ” जीवन गौरव ”  पुरस्कार हा सपत्निक प्रदान केले जातात जीवन गौरव पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या पुरस्कारासाठी शिक्षक  बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : २५  आक्टोबर २०१९ पर्यत पाठवायचे आहे
राज्यभरातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या अध्यापनाचे कार्य मोठ्या तळमळीने व उस्ताहाने करीत आहेत. त्यात शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक,  कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही जीवन गौरव मासिकाची भूमिका आहे. याच अनुषंगाने शिक्षक बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन इत्यादी  सपत्निक प्रदान केले जातात
शिक्षक बंधू-भगिनीनी आपले प्रस्ताव दिनांक :  : २५  आक्टोबर २०१९ पर्यत संयोजक संपादक जीवन गौरव कार्यालय प्लाँट नं . २७ , आनंदनगर , गल्ली नंबर ६ , गारखेडा परिसर औरंगाबाद – ४३१००९ या पत्यावर आपले प्रस्ताव एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी संपादक रामदास वाघमारे मो.नं. ८८८८१२५६१० , उपसंपादक डि.बी. शिंदे -8983369430 ,  सहायक संपादक डाॕ. रत्ना चौधरी – 9096193665 ,   कार्यकारी संपादक मु.अ.  संदीप सोनवणे मो.नं. 9096623827 ,  यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या सचिव श्रीमती मीरा वाघमारे, प्रेरणा अझादे, अंन्सीराम वाघमारे , कमल वाघमारे , राहूल जाधव , लता अचलखांब , प्रेम सपाटे, श्रीमती  कल्पना फुसे, भाग्यश्री इसलवार,  श्रीमती रुपाली बोडके, श्रीमती वैशाली भामरे,वंदना सलवदे वाघमारे ,  बाळासाहेब निकाळजे,पंडीत डोंगरे, आजय खिल्लारे,  प्रा.डाँ.सतीश मस्के, प्रा.डाँ.अशोक डोळस,दिनेश वाडेकर, महादेव हवालदार  विजय पाताडे, देविदास बुधवंत, मु.अ. संतोष दातीर , मु.अ. नागनाथ घाटूळे,     वाणा माच्छी, प्रतिभा शिरभारते, शेख नजमा, गिता केदारे, आश्विनी धाट, छाया बैस, अनिता कांबळे, अंजली गोडसे, शिल्पा फरांदे, आर्चना खोब्रागडे, अनघा सावर्डेकर, वंदना सलवदे, शरद ठाकर, हणमंत पडवळ, उमेश खोसे, महादेव खळूरे, गोपाल सुर्यवंशी, दयानंद बिराजदार, रज्जाक शेख, गणेश सुलताने, मारोती गुरव, स्वामी जाधव, प्रा. भगवान विशे, दुशांत निमकर, प्रशांत सांगळे, कुणाल पवार, दिलीप केने, गणेश कुंभारे, ज्योती अवघडे, प्रा. संपत गर्जे, वैशाली भोजने, यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

नियम व अटी
१)  पुरस्कारासाठी गुरुमाऊलींची सेवा ही सात वर्षा पेक्षा कमी नसावी.
२) पुरस्कारासाठी kg… to…pg  पर्यंतचे गुरुमाऊली प्रस्ताव दाखल करु शकतात.
३) पुरस्कारासाठी पाठविलेल्या प्रस्तावाची दुबारा उलट प्रती मागणी करु नये.
४) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात पेपरची काञणे, फोटो, प्रमाणपञ, शिफारसपञ, या सोबतच प्रस्तावात आपला बायोडाटा असणे गरजेचे आहे.
५) पुरस्कारासाठी एकच प्रत व सोबत दोन रंगीत पासपोर्ट फोटो पाठविणे अत्यावश्यक आहे.
६) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्विकारण्याची सपत्निक तयारी असल्याचे संमतीपञ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
७) पुरस्कार पाञ विजेत्यांची निवड करण्यासाठी संस्थेच्या वतीने परिक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल या समितीचे सर्व निर्णय अंतिम राहतील.
८) पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवित असतांना मुखपृष्ठावर  ” जीवन गौरव पुरस्कार ”   असा स्पष्ट उल्लेख असावा.
९) पुरस्कारासाठी पाठवित असलेल्या प्रस्तावात जोडलेली काञणे, नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे, अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत असे प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील.
१०) पुरस्काराचे  स्वरुप आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, पुस्तक ,शाल ,पेन असे स्वरुप असेल.
११) चारित्र्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
१२) पुरस्कारार्थी हा जीवन गौरवचा सभासद असल्यास प्रधान्य.