हल्ल्याला चोख उत्तर देऊ – राजनाथ सिंह

0
6

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- ‘भारतामध्ये असा दहशतवादी हल्ला होत असेल तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ’, अशी प्रतिक्रीया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

पठाणकोट येथे शनिवारी पहाटे ३.३०च्या सुमारास दशतवाद्यांनी लष्कराच्या हवाई तळावर  हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये चार दहशतवादी ठार झाले तर तीन जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

यावेळी त्यांनी ‘पाकिस्तान हा आमचा शेजारी देश आहे. आम्हाला पाकिस्तानच नव्हे तर शेजारच्या सर्व देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आम्हाला शांतताही हवी आहे. मात्र, भारतावर कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ’, असेही मत व्यक्त केले आहे.