राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला फटकारले

0
12

वृत्तसंस्था
इस्लामाबाद, दि. 04 – हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वानीला शहीद घोषित केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले. दहशतवाद्यांचं शहीद म्हणून उदात्तीकरण करु नये असे राजनाथ सिंह बोलले आहेत. इस्लामाबादमध्ये सार्क परिषदेत बोलताना राजनाथ सिंह यांनी दहशतवादावर आपली भुमिका मांडत असताना पाकिस्तानला त्यांच्याच देशात उभं राहून फटकारले आहे.

‘चांगला किंवा वाईट दहशतवाद नसतो, दहशतवाद हा दहशतवादच असतो. फक्त दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करुन फायदा नाही, तर दहशतवादाला पाठिंबा देणा-या संस्था, व्यक्ती आणि देशांविरोधातही कारवाई केली पाहिजे’, असं मत राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले आहे.