काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींनी मानले काँग्रेसचे आभार

0
9

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. ९ – काश्मीर खो-यात सुरु असलेल्या हिंसक विरोध प्रदर्शनावर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आपले मौन सोडले. काश्मीरमधल्या परिस्थितीवर संयम दाखवल्याबद्दल काँग्रेसचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले. काश्मीरमधली परिस्थिती हाताळताना सर्वांनीच समजूतदारपणा, परिपक्वता दाखवली यासाठी मी काँग्रेसचेही आभार मानतो असे मोदी म्हणाले.

ज्या मुलांनी हातात लॅपटॉप, क्रिकेट बॅट पकडली पाहिजे त्या हातात आज भिरकावण्यासाठी दगड आहेत. प्रत्येक भारतीयाचे काश्मीवर प्रेम आहे. प्रत्येक भारतीयाला जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य काश्मीरमधल्या प्रत्येक नागरीकाला आहे. देशातील अन्य भागातील मुलांसारखेच आम्हाला काश्मीरमधल्या युवकांचे उत्तम भविष्य हवे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात सभेमध्ये ते बोलत होते.