एअर इंडियाने खा. गायकवाड यांचं तिकीट पुन्हा रद्द केलं!

0
21

वी दिल्ली, दि. 28 – एअर इंडियाने पुन्हा एकदा उस्मानाबादचे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट रद्द केले आहे. बुधवार सकाळची गायकवाड यांची मुंबई ते दिल्ली प्रवासाची तिकीट एअर इंडियाने रद्द केली. मागच्या आठवडयात रविंद्र गायकवाडांनी एअर इंडियाचे मॅनेजर आर. सुकूमार यांना चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांचा नो फ्लाय लिस्टमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे रविंद्र गायकवाडांच्या देशातंर्गत विमान प्रवासावर बंदी आली आहे. रविंद्र गायकवाडांनी आपल्या वर्तनाबद्दल माफी मागायला नकार दिला. मी का माफी मागू ? असा उलटा प्रश्न त्यांनी केला. बिझनेस क्लास ऐवजी इकोनॉमी क्लासमध्ये बसवल्याच्या रागातून रविंद्र गायकवाडांनी सुकूमार यांना मारहाण केली होती.संसदेतही शिवसेनेने रविंद्र गायकवाड यांची बाजू लावून धरली आहे.