पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी मला मुख्यमंत्री करून चूक नव्हे तर मोठी चूक केली आहे, असे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.
नितीशकुमार यांनी काही दिवसांपूर्वी मांझी यांना मुख्यमंत्री करून चूक झाली असल्याचे म्हटले होते. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मांझी म्हणाले, ‘नितीशकुमार यांनी आपल्या शब्दामध्ये सुधारणा करावी. चूक नाही तर मोठी चूक केली आहे. मला समजण्यात त्यांची मोठी चूक झाली आहे. मी, गरीब असलो तरी विश्वास घात करणारा नक्कीच नाही. स्वाभिमान जपण्यासाठी काहीही करू शकतो.‘
मी, गरीब असल्यामुळे आमदारांना विकत घेऊ शकत नाही. नितीशकुमारच खरेदी करू शकतात. आमदारांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून ते दिल्लीला घेऊन जात आहेत. यापेक्षा बिहारचा विकास करा, असेही मांझी म्हणाले.