मुंबई, २९: राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात आलेले ‘लोकशाही पुरस्कार’ निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे (मतदारांना अधिक माहिती देण्यासाठीस्पर्धक उमेदवारांचीमाहिती प्रसारित करणे) या विभागात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ला प्रदान करण्यात आले.एडीआरच्या वतीने, एडीआरचे अध्यक्ष व संस्थापक विश्वस्त प्रोफेसर त्रिलोचन शास्त्री आणि संस्थापक विश्वस्त डॉ. अजित रानडे मुंबई येथील हॉटेल आयटीसी मराठा येथे आयोजितपुरस्कारसोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माननीय उपाध्यक्ष श्री. एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला.
२०१६ पासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतल्या गेलेल्या सहा विभागांपैकी १४ संस्थांमध्येआणि व्यक्तींमध्ये एक पुरस्कार मिळविण्यासाठी एडीआर चा समावेश होता.हा पुरस्कार मिळविताना प्रोफेसर शास्त्री यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या त्यांच्या अग्रगण्य कार्यद्दल आणि खेड्यांमध्ये, पंचायत आणि शहरांमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचापाया घातल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ते इतर राज्यांपर्यंत पोचविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
२०१६ मध्ये उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रे ईफाईलिंग करणे आणि प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीचे डिजिटलकरण करणारे एसईसी महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. एसईसी महाराष्ट्राच्या सहकार्यानेएडीआरने महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता उमेदवारांची आणि विजेत्या उमेदवारांची पिढी सक्षम केली.गेल्या चार वर्षांत, एडीआर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने स्थानिक संस्था निवडणुकांवरील ७७ अहवाल प्रकाशित केले, ज्यामध्ये लोकसत्ता, लोकमत, पुढारी आणि महाराष्ट्र टाईम्ससारख्यामहाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्या वृत्तपत्रांसह प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये छापले गेले.