व्यावसायिकांना कर्जमाफी मिळते मग, शेतक-यांना का नाही ? – उद्धव ठाकरे

0
5

जळगाव, दि. २० – उद्योगपतींच कर्ज माफ होतं मग, शेतक-याचं कर्ज का माफ होत नाही ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमध्ये झालेल्या सभेत विचारला. सरकारमध्ये सहभागी असूनही शिवसेना आणि भाजपमध्ये परस्परांवर कुरघोडी राजकारण सुरुच आहे.

जळगावमध्ये झालेल्या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वाती पिटलेच्या आत्महत्या प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टिका केली. महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी पैसे नाहीत ही शरमेची बाब आहे असल्याचे ते म्हणाले.