दिग्विजय सिंह :राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे

0
5

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही. जर त्यांना कॉंग्रेसची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांनी पक्षाला कॉंग्रेसमध्ये विलीन करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यास चुकीचा संदेश जाईल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी केले होते. यावर सिंह यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले.

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची पिछेहाट झाल्यानंतर आता पक्षात ‘सर्जरी’ची आवश्यकता आहे. या मतावर मी आजही कायम आहे. कॉंग्रेसमध्ये तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात जोडण्याची आवश्यकता आहे, याचा पुनरुच्चार दिग्विजय सिंह यांनी केला.