शिवसेनेचा सूर्य कधीच मावळणार नाही- संजय राऊत

0
14

मुंबई, दि. 23 – मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच वरचष्मा कायम राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा तळपता सूर्य हा कधीच मावळणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी बहुतेक जागांचे निकाल हाती आले आहेत. शिवसेनेने तब्बल 90 जागांवर आघाडी घेतली असून, शिवसेनेला जवळपास 84 जागा मिळण्याचा अंदाज आहे.