…तर मुख्यमंत्र्यांना गाईचे दूध काढायला लावू; विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे

0
11

वर्धा दि.६़: राज्याचे मुख्यमंत्री आपण स्वत: शेतकरी असल्याचे सांगतात. शेती व शेतीशी संबंधीत गोष्टी माहिती असल्याचे सांगतात. दादा आपण एकदा परवानगी द्या, राज्याच्या मुख्यमंत्र्याना वर्षा बंगल्यावर गाईचे दूध काढायला लावतो, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल पदयात्रेत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागतांना वर्धा येथे दिला. वर्धा जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून राष्ट्रवादी कॉँग्रेसची पदयात्रा मुक्कामी आहे. जाहीर सभेमध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली.
विदर्भाने भाजपच्या पदरात मोठ्या जागा टाकल्या. मात्र विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप करताना धनंजय मुंडे म्हणाले की वर्धेच्या भूमितूनच महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा इशारा दिला होता. आता जनतेने देशातून भाजपला चले जावचा इशारा याच भूमीतून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.यात्रेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष आ. सुनिल तटकरे, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, सुरेश देशमुख, राजु तिमांडे, अ‍ॅड. सुधीर कोठारी आदी उपस्थित होते.