प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार: पटोले

0
11

अमरावती,दि.21-नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने भाजपला निवडून दिले. एक ही आश्वासनांची पूर्तता केली नसून मोदींनी लोकांना फसवले असून भारतीय जनता पक्षातील लोकशाही संपल्याचे टीकास्त्र माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी साेडले. प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.सत्तेत असताना काँग्रेस कधीच लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला नाही. विरोधी बाकावर असताना भाजप लोकशाहीला पूरक होता. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर पारदर्शकता येईल असे वाटत होते. लोकांनी देशात बदल घडवत भाजपला सत्ता दिली. मात्र भाजप लोकशाहीच्या मूळावरच उठल्याचे पटोले म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रथमच अशाप्रकारे वक्तव्य केल्याने ते दिसून येत अाहे. ओबीसी कमिशन लोकसभेत मंजूर केले, मात्र राज्यसभेत भाजपने अडवले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे संपूर्ण पैसे केंद्र सरकारने देणे गरजेचे असून ते अडवण्यात आले आहे. ओबीसीकरिता वैद्यकीय शिक्षणाच्या १५ टक्के जागांचे आरक्षण दिले, मात्र जागा भरण्यात आलेला नाही. जातीचे प्रमाणपत्र, जाती पडताळणी प्रमाणपत्रांची अडवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याचे पटोले म्हणाले.