महानगरपालिका निवडणुकीतून मनसेची माघार

0
8

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे. मनसे फक्त नाशिक, कल्याण-डोंबिवली व मुंबई मनपा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही सांगण्यात आले.

गेल्या वेळी नवी मुंबई व औरंगाबाद मनपात अनुक्रमे ४० व ५४ जागा मनसेने लढवल्या होत्या. त्यापैकी औरंगाबादेत राज वानखेडे हा एकमेव नगरसेवक निवडून आला होता.