टोलमुक्तीची घोषणा-जनतेची फसवणुक

0
16

मुंबई- राज्य सरकारने केलेली टोलमुक्तीची घोषणा म्हणजे जनतेची शुद्ध फसवणुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.तर ही घोषणा म्हणजे निव्वळ मलमपट्टी असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेस आघाडी सरकारने टोल संदर्भात काही निर्णय घेतले होते. टोलबाबत वेगळे स्वतंत्र धोरण आखण्याची तयारीही आपल्या सरकारने केली होती, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी ही टोलमुक्तीची घोषणा म्हणजे लोकांची दिशाभूल असल्याचे सांगितले. काही टोलची मुदत संपत आली होती. त्यामुळे त्या टोल नाक्यांवरील टोलमुक्ती होणार होतीच. त्यामुळे भाजपाची टोलमुक्तीची घोषणा हवेतच विरली आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.