भारत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

0
5

वृत्तसंस्था
लंडन, दि. 17 – भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला आहे. कारण पहिल्यांदाचा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे भारताचं पदक नक्की झालं आहे. विशेष म्हणजे साखळी सामन्यात पराभव स्विकारावा लागलेल्या ऑस्ट्रेलियासोबतच अंतिम सामना होणार आहे. ब्रिटन आणि बेल्जियममधील सामना बरोबरीत सुटल्याने भारत अंतिम सामन्यात पोहोचला आहे. गुरुवारी झालेल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4-2 ने पराभूत केलं होतं.