माओवाद्यांनी केली तेलंगणाच्या सहा टीआरएस पदाधिकाऱ्यांची सुटका

0
7

गडचिरोली – माओवाद्यांनी चार दिवसापूर्वी खम्मम जिल्ह्यातील भद्राचलम तालुक्यातून तेलंगणाच्या सहा टीआरएस पदाधिकाऱ्यांचे अपहरण केल होते. त्या अधिकाऱ्यांची माओवाद्यांनी सुटका केली आहे.

माओवाद्यांनी या अधिकाऱ्यांचे अपहरण तेलंगणात खोट्या चकमकी होत असल्याचा आरोप करत केले होते. दरम्यान त्यांची आज मुक्तता करण्यात आली असून हे सर्व अधिकारी शनिवारी चेर्लाला येथे परतले आहेत. ही घटना गुरुवारी त्यावेळी उघडकीस आली ज्यावेळी टीआरएसचे अधिकारी काही नागरिकांना भेटण्यासाठी म्हणून एका दुर्गम गावात गेले होते. मात्र ते घरी परतले नाही.