छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून १६ गावक-यांची हत्या

0
7
वृत्तसंस्था
रायपूर, दि. २ – छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी १६ गावक-यांची हत्या केली.  नारायणपूरवर नक्षलवाद्यांचे वर्चस्व आहे. नक्षलवाद्यांच्या कांगारु न्यायालयाने हे गावकरी पोलिसांचे खबरी असल्याचा निकाल दिल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.
ही घटना २९ फेब्रुवारी रोजी घडली. नक्षलवाद्यांनी बैठकीसाठी गावक-यांना बोलावले होते. त्यावेळी कांगारु कोर्टाच्या सुनावणीत या गावक-यांना पोलिसांचे खबरी असल्याच्या आरोपाखाली दोषी धरण्यात आले. तीन गावक-यांचे मृतदेह आतापर्यंत मिळाले असून, १३ मृतदेह नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.