शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिल्याची फडणवीसांची कबुली

0
7
मुंबई, दि. १७ – शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
शेतक-यांच्या आत्महत्येवर कर्जमाफी हा उपाय नाही. कर्जमाफीने मतं मिळतील मात्र समस्या सुटणार नाहीत. कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही, कर्जमाफीनंतरही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.