युपीएने दोन वर्षे काहीच केले नाही- सोनिया गांधी

0
7

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दोन वर्षे काहीच केले नसल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

कॉंग्रेसच्या मुख्यालयात आंध्र प्रदेशमधील पक्षाच्या प्रतिनिधींना गांधी संबोधित करत होत्या. यावेळी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशच्या प्रतिनिधींना भेट घेत नसल्याबद्दल टीका केली. “जवळपास दोन वर्षे निघून गेली आहेत. तरीही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने काहीही केले नाही. मला माहित आहे तुम्ही (आंध्र प्रदेश कॉंग्रेस प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र मोदी यांना तुम्हाला भेटण्याची भीती वाटत आहे.‘ नेहमी विरोधात असलेल्या केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवरच टीका केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.