बस अपघातात 13 जणांचा मृत्यू

0
12
वृत्तसंस्था
रायपूर – छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री पुलावरून खासगी प्रवासी बस कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. तर, 53 जण जखमी झाले आहेत.
 
रायपूरपासून 400 किमी अंतरावर असलेल्या दालधोवा घाटात पुलावरून कोरड्या नाल्यात ही बस कोसळली. रायपूरहून झारखंडमधील गाधवा येथे ही बस जात होती. रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. समोरून आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमी असलेल्या 16 प्रवाशांना अंबिकापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.