29 प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्‍पो पडला नदीत, 3 जण ठार

0
10

औरंगाबाद- औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर पाथ्री येथील गीरजा नदीच्या पूलावर कठडा तोडून टेम्‍पो पूलाखाली कोसळला. गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करुन घरी परतणारे 29 भाविक या टेम्‍पोमध्‍ये होते. पूलावरील खड्डा पाहून ब्रेक लावल्‍याने हा अपघात झाला. कठडा तोडून टेम्‍पो गिरजा नदीत कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन जण ठार झाले.बूधवारी दुपारी 2 च्‍या दरम्‍यान हा अपघात झाला आहे. नगर जिल्‍ह्यातील बिजापूरचे भाविक सिल्‍लोडमधील आमसरी येथील श्री अंबरऋषी आश्रमात आले होते. तेथील उत्सव आटोपून ते बूधवारी घरी परतत होते, टेम्‍पो क्रमांक एम. एच. 04 सी.ए. 1757 पैठणकडे जात असताना अपघात झाला. टेम्‍पोचा पुढील भाग पाण्‍यात अडकल्‍याने तिघांना बाहेर निघता आले नाही.