रायपूर:- छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. शनिवारी सकाळपासून ही चकमक सुरू आहे.
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोडका भागात सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमद्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत आतापर्यंत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सध्या सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. नक्षलविरोधी मोहिमेत जवान व नक्षलवाद्यांमध्ये सतत चकमकी होत आहेत. सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तोडका परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती.
माओवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतररित होत आहेत किंवा अंतर्गत भागात बैठकाही घेत आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी विजापूर जिल्ह्यात कारवाई सुरू केली. यात त्यांची माओवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत आठ माओवादी ठार झाले आहेत. मृत नक्षलवाद्यांची संख्याही वाढू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. तीन जिल्ह्यांच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत नक्षलवाद्यांना घेरल्याचे सांगण्यात येत आहे. ही चकमक अजूनही सुरूच आहे. या चकमकीत सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफचे जवान सहभागी झाले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांनी शस्त्रेही जप्त केली आहेत. बस्तरमधून नक्षलवाद संपवण्यासाठी मार्च-२०२६ ची वेळ निश्चित करण्यात आली आहे