भारतीय जवानांनी केला 10 जणांचा खात्मा,1 जवान शहीद

0
6

वृत्तसंस्था

श्रीनगर- भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमक थांबायचे नाव घेत नाही. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकच्‍या कारवाचा सुरूच आहेत. मंगळवारी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय लष्‍कारावर गोळीबार करण्‍यास सुरूवात केली.
– पाकचा गोळीबाराच्या आडून दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरूच आहे.
– मात्र, सतर्क असलेल्‍या भारतीय सैनिकांनी या गोळीबाराला चोख उत्‍तर दिले आहे.
– भारतीय जवानांनी 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
– दोन्‍ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्‍याची माहिती आहे.
– त्‍यामुळे आणखी काही दहशतवादी लपून बसल्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.
– दोन दिवसांपूर्वीच उरीतील सैन्याच्‍या मुख्यालयावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला.
– दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्‍्यात भारताचे १८ जवान शहीद झाले.
– लच्छीपोरा भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.