रायपूरमध्ये दीडशे दुचाकी जळून खाक

0
13

रायपूर,दि.9(वृत्तसंस्था)- छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील रेल्वे स्थानकाबाहेर पार्क केलेल्या दुचाकींना आग लागल्याने जवळपास दीडशे दुचाकी खाक झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.पार्किंग लॉटमध्ये कुणीतरी कचरा पेटवला आणि निघून गेला.त्या कचऱ्याची आग एका दुचाकीपर्यंत पसरली. हळूहळू तिथे उभ्या असलेल्या सर्व बाईक्स आगीच्या गर्तेत आल्या आणि शिल्लक राहिला तो फक्त स्टीलचा सापळा.या आगीने मोठा रुप घेतल्याने रेल्वेच्या परिसरात आगीचे गोळेच बघावयास मिळत होते.अग्निशमन विभागाच्या गाड्याने या आगीवर नियंत्रण आणले असून रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.