राज्यातील आठ तालुक्यात दुष्‍काळ जाहीर

0
13

मुंबई,दि.25– राज्य शासनाने आज (बुधवार) राज्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यात यवतमाळ, जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे.मागील काही महिन्यांपासून केलेल्या सर्वेक्षणातून राज्यशासनाने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे राज्यातील जळगाव, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.