जनता एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले, 15 ठार, 50 जखमी

0
14

लखनऊ – रायबरेलीच्या बछरावां रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी जनता एक्सप्रेसचे चार डबे पटरीवरून घसरले आहेत. या दुर्घटनेमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून, 50 च्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींच्या जवळच्या रुग्णआलयात दाखल करण्यात आले आहे. ही रेल्वे देहराडूनहून वाराणसीला जात होती.उत्तर रेल्वेचे सीपीआरओ नीरज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे बछरावां रेल्वे स्थानकावर न थांबताच दुसऱ्या पटरीवर गेले. त्यानंतर इमर्जंसी ब्रेक लावल्यानंतर रेल्वेचे डबे रुळावरून खाली घसरले. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दो लाख आणि जखमींना 50 हजारांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ पसरली आहे. अपघातानंतर लगेचच अधिकारी आणि मदतीसाठी पथके घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहेत. जखमींचा आकडा वेगाने वाढत असून लखनऊमधील रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. तसेच जखमींसाठी 100 खाटा राखीव करण्यात आल्या आहेत.

रायबरेलीचे सपा आमदार आणि कॅबिनेट मंत्री मनोज पांडेय यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. या घटनेची माहिती मिळताच लगेचच 108 आणि 102 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. तसेच कार्यकर्त्यांनाही मदतकार्यासाठी घटनास्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत