नक्षल्यांनी जाळला वनविभागाचा नाका

0
8

गडचिरोली, दि.११: सशस्त्र नक्षल्यांनी काल(ता.१०) रात्री आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील गुड्डीगुडम येथील वनविभागाचा नाका जाळल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे वनकर्मचा-यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
काल रात्री १५ ते २० सशस्त्र नक्षली गुड्रडीगुडमच्या नाक्यावर आले. त्यांनी नाक्यावरील कर्मचा-यांना धमकावून कार्यालयाला आग लावली आणि पसार झाले. या आगीत कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. मात्र नक्षल्यांनी कर्मचा-यांना कुठलीही इजा केली नाही. घटनेचे वृत्त समजताच रेपनपल्ली येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आज सकाळी घटनास्थळी रवाना झाले आहेत.