टोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही – गडकरी

0
8

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २१ – निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी ‘टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही’ असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गडकरींनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याने सरकारने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘जनतेला चांगले रस्त हवे असतील तर टोल राहणारच’ असे सांगत टोल पूर्णपणे बंद होणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याच गडकरींनी विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान ‘आपण टोलचा खेळ सुरू केला होता आणि आता आपणच तो बंद करू’ असे आश्वासन देत जनतेला गाजर दाखवलं होतंं. मात्र सरकार सत्तेवर येऊन अवघे वर्ष पूर्ण होते न होते तोच त्यांनी आपल्या विधानावरून पलटी मारली आहे.