नागपूरात जतिरामजी बर्वे यांचा स्मृतिदिन झिरो माइल येथे उत्साहात साजरा

0
8

नागपूर,दि.18ः- सामाजिक जाणिवेतून काम करणारे भोईमच्छिमाराच्या हक्कासाठी लढणारे जतिरामजी बर्वे यांचा 39 वा स्मृतिदिन नागपूरातील झीरो माइल येथे त्यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन उत्साहात साजरा करण्यात आला.विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय पदाधिकारी, राजकीय नेते आदींसह जतिरामजी बर्वे यांचे सुपुत्र अशोक बर्वे,माजी मंत्री परिणय फुके, आमदार सुनील केदार (माजी मंत्री) अन्य मान्यवारांनी यावेळी आपली उपस्थिती दर्शविली.

याप्रसंगी जतिराम बर्वे स्मृति प्रतिष्ठान द्वारा संविधान चौक नागपुर येथे आयोजित मच्छिमारांच्या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना रामटेक मतदारसंघाचे खासदार कृपालजी तुमाने म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्य लढयात बर्वेसाहेबांचे मोठे योगदान आहे. तर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य विसरता येत नाही. तसेच मच्छीमार समाजाच्या सामाजिक व आर्थिक कल्याणसाठी गांव पातळी पासून ते राष्ट्रीय स्तरा पर्यतं मच्छीमार संस्थाची बांधणी करुन एक संघ केले. देशातील नैसर्गिक जल स्त्रोतांचा योग्य वापर व्हावा व त्यातून पारंपरिक मच्छिमारांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटावे, अशी व्यवस्था निर्माण केली.रामटेकचे आमदार आशीष जायसवाल म्हणाले की जतिरामजी बर्वे यांनी 1943 मध्ये रामटेक येथे स्थापित केलेली फिशरमैन सोसायटी कडून नवीन शासन निर्णयानुसार खिंडसी जलाशय काढण्यात आले.त्यामुळे संस्थेच्या दोन हजार सभासदांवर उपजीवीकेचे प्रश्न निर्माण झाले, ही शोकांतिका आहे. आज ठेकेदार, खाजगी कंपनी, भांडवलदार आदींनी पारंपरिक मछिमारांच्या व्यवसायावर अतिक्रमण करुन संस्था व शासकीय तलाव, जलाशय बळकावित असल्याची खंत व्यक्त केली.

माजी आमदार परिणय फुके व आमदार सुनील केदार यांच्याकडे शून्य मैल येथील विदर्भ संघाची वास्तु 17 डिसे 2017 रोजी मेट्रोसाठी लागत असल्याचे सांगून जमीनदोस्त करण्यात आली. त्याऐवजी दूसरी जागा देवू म्हणून सरकारद्वारा दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही.शून्य मैल येथून हेरिटेज वाक करण्याचा प्रस्ताव कोर्टाने रद्द केल्यामुळे ती जागा तशीच पडून आहे. तेव्हा ती जागा विदर्भ संघाला परत करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर सरकार सोबत चर्चा करण्याकरीता पुढाकार घेण्याचे मान्य करण्यात आले. याप्रसंगी जातिराम बर्वे स्मृति प्रतिष्ठानचे अशोक बर्वे, चंद्रलाल मेश्राम (माजी न्याय. व सदस्य मागासवर्ग आयोग), दीनानाथ वाघमारे (संघर्ष वाहिनी), लकारिया, गजेंद्र चाचरकर, चित्रा बाथम (कानपुर), उमेश कोर्राम (स्टूडेंट्स एसोसिएशन ऑफ इंडिया), मीनाक्षी गेडाम, अड़ धानुजी वलथरे, प्रकाश डायरे (माजी सह.संचालक), प्रभाकर मांढरे इत्यादि अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले.