खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्याचे न उतरताच परतले

0
18

नागपूर,दि.09-शहरात गुरवार पासून संततधार पडणाऱ्या पावसाचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील बसला.विमानतळावरील कमी दृश्यतेमुळे नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विमान उतरू न शकल्याने मुख्यमंत्र्यांना मुंबईला परत जावे लागले.गेल्या ३६ तासांपासून संपूर्ण विदर्भात पाऊस सुरु आहे.कुठे मुसळधार तर कुठे संततधार.अशात नागपुरात विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईहून नागपूरला विमानाने आले.मात्र नागपुरात आज सकाळ पासूनच जोरदार पाऊस असल्याने विमानतळावर कमी दृश्यता होती ज्यामुळे एटीसीने मुख्यमंत्र्यांच विमान उतरविण्यास परवानगी दिली नाही.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाला नाईलाजास्तव मुंबईला परत जावे लागले.नागपुरात मुख्यमंत्री आज प्रामुख्याने चार कार्यक्रमांना हजेरी लावणार होते.यात इंटरनेशनल कँसर कॉंग्रेसचे उद्घाटन,शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन व वरीष्ठ पत्रकार जोसेफ राव यांच्या षष्ठब्दीपूर्ती समारोह या कार्यक्रमांचा समावेश होता.