एनआरएचएमच्या कर्मचार्यांनी काढला मोर्चा,जिल्हाधिकार्यांना निवेदन

0
11

nrhm1गोंदिया,berarimes.com दि.3- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासह शासनाचे लक्ष वेधण्याकरीता सुरु केलेल्या आंदोलनातर्गंत आज(दि.3) येथील सुभाष शाळेच्या मैदानापासून भव्यदिव्य अशा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचल्यानंतर जाहिर सभेत परिवर्तीत झाला.या मोर्च्याचे नेतृत्व सुनिल तरोणे,आयटकचे हौसलाल रहागंडाले,राज्य कर्मचारी संघटनेचे लिलाधर पाथोडे,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे पी.जी.शहारे आणि माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.भीमराव मेश्राम,,अर्चना वानखेडे यांनी केले.यावेळी सर्वांनी मार्गदर्शन करीत एनआरएचम कुठल्याही परिस्थितीत बंद होता कामा नये यासाठी सतत आंदोलनात्मक भूमिका सुरु राहणार असल्याचे सांगितले.तर डाॅ.भीमराव मेश्राम यांनी 11 वर्ष एनआरएचएममधील कर्मचारी अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे आज ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.आधीच्या तुलनेत या वर्षात चांगले आरोग्य लोकांना मिळत आहे हे एनआरएचम योजनेचे यश असून केंद्र सरकार व राज्यसरकार हे अभियान 2017 मार्चमध्ये बंद करणार आहे.त्याआधी आपण मुबंई उच्च न्यायालयात यासंबधीची जनहित याचिका दाखल करणार असून ही योजना बंद करण्यापासून शासनाला रोखणे हाच उद्देश असल्याचे सांगितले.IMG-20160903-WA0174
केंद्रसरकारने मार्च 2017 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या अभियानंतर्गत आरोग्यसेवा पुरविणारे जिल्ह्यातील सुमारे 100 डाॅक्टरसह 700 कर्मचारीवर्गाला नोकरीपासून वंचित व्हावे लागणार आहे.अभियान बंद होण्यापुर्वी राज्यसरकारने या सर्व कर्मचार्याना नियमित आरोग्य सेवेत सामावून घ्यावे या मुख्य मागणीला घेऊन 24 सप्टेंबर पासून जिल्ह्यातील कर्मचारी अधिकारी हे काळ्या फिती लावून कामकाज करीत होते. राज्यव्यापी आंदोलनातर्गंत आज शनिवारला त्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर केले.
दुर्गम भागातील जनतेपर्यंत सेवा देण्याचे काम आरोग्यसेवक करीत असतात. परंतु, त्यांची सेवा उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी कमी पडते. ग्रामीण भागात गरोदर महिला, बालके, प्रसूती झालेल्या महिला आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी २००५ पासून संपूर्ण राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जात आहे. या कर्मचाऱ्यांचे २००६ पासून मासिक मानधन अत्यल्प आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अल्पशा मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. नोकरीत कायम करण्यात येईल, या आशेवर हे कर्मचारी काम करीत आहेत. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे कर्मचारी-अधिकारी वर्गाने काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे.विरोधी पक्षात असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनआरएचम कर्मचारीला कायम करावे अशी मागणी केली होती,आता मात्र सत्तेत तेच असताना आपले शब्द विसरल्याचा आरोपही कर्मचारी वर्ग करीत आहेत. आंदोलनातर्गंत 19 सप्टेंबरला एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारणे,आक्टोबंर महिन्यात अहवालपाठविण्यासह सर्व रिपोर्टिंग देणे बंद करणे, 2 नोव्हेबंरपासून बेमुदत काम बंद आदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरावर कर्मचारी अधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी महासंघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष सुनिल तरोणे,उपाध्यक्ष अर्चना वानखेडे,सचिव संजय दोनोडे,डाॅ.मिना वट्टी,प्रदिप रहागंडाले,अविनाश वराडे,संकेत मोरघरे,राजीव येडे ,डाॅ.योगेश पटले,अजितसिंग,तिवारी, पवन वासनिक, ग्रि्ष्मा वाहने,प्रतिमा मेश्राम,संजय मेंढे,अर्चना चौधरी,राखी प्रसाद,रेखा पुराम,अर्चना कांबळे,ललीता गौतम,ममता गजभिये,शालिनि राऊत,निशांत बनसोड,अनिरिध्द शर्मा,अनिल रहमतकर,ुप्रकाश थोरात,सतिश माटे,मनोज सातपुते,विद्या रहागंडाले ,माया नागपूरे,संजय बिसेन यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.या आंदोलनाला जिल्ह्यातील बहुतांश संघटनानी आपला पाठिबां जाहिर केला होता.