पोलीसांनी अटक केलेले निंबार्तेसह 31 जण 10 तासापासून उपाशी

0
10

भंडारा,दि.8-पवनी तालुक्यातील विरली गावाजवळ मंगळवारच्या रात्री झालेल्या घटनेत एका ट्रकचालकासह क्लिनरचा मृत्यू हा पोलीसांच्या बेजाबबदारपणामूळे झल्याने त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन रास्तारोको आंदोलन करणारे काँग्रेसचे युवा नेते महेंद्र निंबार्तेसहित 31 लोकांना भंडारा पोलिसांनी बुधवराल अटक केली.त्या 31 लोकांना अद्याप जामीन मिळालेला नसून कालपासून त्यांना फक्त एकदा चहा देण्यात आले आहे.आज सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांना जेवण किंवा नास्तासुध्दा मिळाला नसल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.अटक कुणालाही गेली असली तरी मानवाधिकार आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना उपाशी ठेवता येत नाही.परंतु पोलीसानी आपल्याच पोलीसांच्या विरोधात आंदोलन करणार्या आंदोलकांना मात्र रात्रभर उपाशी ठेवले आहे.अजून पर्यंत कुणालाही जामीन दिला नाही, ह्याचा अर्थ त्या सगळ्यांना आज कोर्टात हजर करून नंतर कोर्टातून जामीन मिळू शकतो. पोलिसांच्या वागणुकीमुळे ट्रक चालक टायर खाली आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. हि घटना दुर्दैवी असून संबंधित पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ह्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले महेंद्र निंबार्ते व इतर 31 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.