डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकारा : विजय रहांगडाले

0
15
तिरोडा ,दि.21: विश्‍वर▪डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. त्यांचासारखा महापुरुष आपल्या देशाला मिळणे हे सौभाग्य आहे. प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार अंगीकारावे असे मत आमदार विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले.
महाप्रज्ञा बुद्ध विहार समिती खैरलांजी रोड तिरोडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान सामाजिक सभागृह बांधकाम समाजकल्याण विभागाकडून मंजूर करून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी माजी आ.भजनदास वैद्य, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, कृउबास मुख्य प्रशासक डॉ.चिंतामण रहांगडाले, संजयसिंह बैस, भाऊराव कठाणे, सलामभाई शेख, विजय बन्सोड, राजेश गुणेरिया, उमाकांत हारोडे, अतुल गजभिये, प्रकाश गेडाम, के.के.वैद्य, रत्नाकर नंदागवळी, वंदन चव्हाण, सीमाताई साखरे, डॉ.के.एल.शेंडे, गुणवंत बन्सोड, ए.व्ही.दहीवले, सारंगाबाई वासनिक, प्रमोद गौतम, प्रवीण शेंडे उपस्थित होते. संचालन पंचशीला रामटेके यांनी तर आभार गजभिये यांनी मानले.