नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांना “ठेकेदार राज’ जबाबदार’

0
9

नागपूर,दि.27 – छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासाठी त्या राज्यात सुरू असलेले “ठेकेदार राज’ जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला.

छत्तीसगडमधील नुकत्याच झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी; तसेच जखमी जवानांची विचारपूस करण्यासाठी दिग्विजयसिंह नुकतेच रायपूरला गेले होते. तेथून परत आल्यानंतर आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की नक्षलवादी व पोलिसांमध्ये ठेकेदार मध्यस्त असून, आपल्या काळात ठेकेदार पद्धत संपुष्टात आणली होती. छत्तीसगडमध्ये आता “ठेकेदार राज’ पुन्हा सुरू झाले आहे. तेंदू व दारूचा व्यवसाय करणाऱ्या ठेकेदारांना जो पर्यंत हद्दपार करीत नाही, तोपर्यंत या समस्येवर तोडगा निघणे अशक्‍य आहे. केंद्रीय पथकात व राज्य पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप दिग्विजयसिंह यांनी केला.