आगीत दोन दुकाने जळून खाक

0
14

गडचिरोली, दि.२३: जिल्ह्यातील चामोर्शी येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लागून दोन दुकाने भस्मसात झाल्याची घटना घडली. यामुळे दुकानमालकांचे मोठे नुकसान झाले आहे.सगणापूर-कान्होली मार्गावर सुभाष अक्कलवार व संजय कोमावार यांची दुकाने होती. कुणीतरी शेतातील कचरा जाळल्याने आग रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानापर्यंत येऊन पोहचली आणि दोन्ही दुकाने जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत, पंचायत समिती सदस्य धर्मशिला सहारे, सरपंच दिगंबर धानोरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आग लागल्याने दोन्ही दुकानमालकांचे प्रत्येकी ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्तांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी कविता भगत यांनी केली आहे.