गोंदिया, दि. 5 – कर्जमाफीसहीत विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.गोंदिया जिल्हयात आमगाव व सालेकसा तालुक्यात कळकळीत बंद पाळण्यात आला.शेतकरी पंचायत,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,मराठा सेवा संघासह राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आदींनी मिळून या आंदोलनात सहभाग नोंदविला.तसेच मागण्याचे निवेदन सादर केले.या निवेदनात स्वामीनाथन आयोग लागू करा,शेतकयाची पुर्ण कर्जमुक्ती करा,सात बारा कोरा करा आदी मागण्यांचा समावेश होता. आमगाव येथे निवेदन देतेवेळी शेतकरी पंचायतचे तुलेंद्र कटरे,धिरेश पटेल,हुकुमचंद बहेकार,कमलबापू बहेकार,क्रांती जायस्वाल,विजय रहागंडाले,रवी क्षिरसागर यांच्यासह अनेकांचा समावेश होता.सालेकसा येथे ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,मनोज डोये,तुकाराम बोहरे,मनोज शरणागत,प्रभाकर दोनोडे,अनिल फुंडे,वासुदेव फुंडे ,विजय फुंडे.गणेश बघेले,संजू बारसे,वैभव हेमने,योगेश फुंडे,विजय ठाकरे,मनोहर कटरे,बबलू टेंभरे,नेपाल पटले आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यवतमाळ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाननंही कडकडीत बंद पाळला आहे. शेतक-यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास शासनाकडून होत असेलल्या दिरंगाईला विरोध दर्शवण्यासाठी शेतक-यांनी बसस्थानक चौकात मुंडण करून शासनाचा निषेध केला. तसंच यवतमाळ-घाटंजी मार्गावरील कोळंब फाटा आणि नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील भांबराजा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आल्यानं येथील वाहतूक ठप्प झाली होती.