यवतमाळ दि.११ : कीटकनाशक फवारणी शेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे. मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कृषी कार्यालयांमध्ये अधिका-यांना जाब विचारत राडा घातला. तसेच, त्यांनी कार्यालयाची तोडफोड करत कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या.कीटकनाशकांच्या फवारणीनंतर यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात 34 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला.