पालकमंत्र्यानी केली जानवा येथील पिकाची पाहणी

0
7

अर्जुनी मोरगाव,दि.23- तालुक्यात गेल्या दोनचार दिवसापुर्वी आलेल्या अवकाळीपावसामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.या पावसामुळे जानवा येथील अनेक शेतकर्यांच्या शेतातील धानपिकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असून पालकमंत्री राजकुमार बडोेले व जिल्हाधिकारी डाॅ.अभिमन्यू काळे यांनी पाहणी केली.पावसामुळे गावातील धान पिकाची  ५० % च्यावर नुकसान झाल्याचा अंदाज असून त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी यांनी यावेळी गावकर्यांना मार्गदर्शन केले.त्यांच्यासोबत जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे,तहसिलदार,तलाठी,ग्रामसेवक,कृषी विभागाचे काही अधिकारी गावातील सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.