राष्ट्रवादीच्या हल्लाबोल पदयात्रेला सुरुवात

0
9

वर्धा,दि.09 – वर्धा जिल्हयातील सेलू तालुक्यातून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल पदयात्रेच्या आठव्या दिवसाची जोरदार सुरुवात झाली. यशवंत विदयालय आणि सेलू येथील विदयार्थ्यांनी या पदयात्रमध्ये सहभाग घेतला. पदयात्रेमध्ये युवकांचा, विदयार्थ्यांचा आणि शेतकऱ्यांचा सहभाग मोठया प्रमाणात होता.आज सेलू येथून सुरु झालेल्या आठव्या दिवसाच्या पदयात्रेत खासदार सुप्रिया सुळे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार विदया चव्हाण, आमदार राणा जगदिशसिंग, आमदार अमरसिंह पंडीत, माजी आमदार संदीप बजोरिया, माजी आमदार सुरेश देशमुख, युवक प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वर्धा जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले, यवतमाळ जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत आदींसह या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.

गेले आठ दिवस ही हल्लाबोल पदयात्रा सुरु असून प्रत्येक दिवशी या पदयात्रेला शेतकऱ्यांचा मोठा पाठींबा मिळताना दिसत आहे. शेतकरी आपल्या व्यथा सांगण्यासाठी पुढे येत आहेत. सरकार शेतकऱ्यांचे राहिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे रहावे, असे पक्षाच्या वरिष्ठांना शेतकरी सांगत आहेत.