जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवा – खा. अशोक नेते

0
8

गोंदिया,दि.30ः- तालुक्यातील नागरिक आपल्या अनेक समस्या व विविध कामे घेऊन तालुका मुख्यालयातील कार्यालयात येतात तेव्हा अधिकार्‍यांनी त्यांच्या समस्यांची जाण ठेवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडी-अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, असे प्रतिपादन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी केले. ते सोमवारी २९ ऑक्टोबर रोजी सालेकसा येथे आयोजित जनता दरबार कार्यक्रमात अधिकार्‍यांना निर्देश देताना बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय पुराम, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुका अध्यक्ष परसरामजी फुंडे, महामंत्री राजेंद्र बडोले, मनोज बोपचे, आमगाव तालुका महामंत्री नरेंद्र वाजपेयी, राकेश शेंडे, आमगाव शहर अध्यक्ष घनश्याम अग्रवाल, खेमराज लिल्हारे, शोभेलाल कटरे, बाबूलाल उपराडे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या अनेक समस्या खा. नेते यांच्यासमक्ष मांडल्या. प्रसंगी खा. नेते यांनी उपस्थित संबंधित अधिकार्‍यांना या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. जनता दरबारात तालुक्यातील वीज वितरण, आरोग्य विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग आदी सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.