गोंदियावरून हजारो नागरिक अयोध्येला जाणार

0
8

गोंदिया,दि.06 : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनावरून राममंदिर निर्माणाच्या मुद्याला घेऊन २५ नोव्हेंबर रोजी हजारो नागरिक अ‍ॅड. वीरेंद्र जायस्वाल यांच्या नेतृत्वात अयोध्येला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव अ‍ॅड. वीरेंद्र जायस्वाल यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.रामंदिराचा मुद्दा हा हिंदंंूसाठी प्राथमिक मुद्दा असून भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील शेकडो कारसेवकांसोबत अडॅ. वीरेंद्र जायस्वाल यांचे वडील स्व. कस्तुरचंद जायस्वाल जौनपूर तुरुंगात १८ दिवस बंदिवान होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी जो राममंदिराचा मुद्धा उपस्थित केला त्याचे स्वागत अ‍ॅड. वीरेंद्र जायस्वाल यांनी केले असून २३ नोव्हेंबर रोजी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील हजारो नागरिक रेल्वेने अयोध्या येथे जाऊन रामललाचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत..