24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
45

भंडारा,दि.१६ : जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया लि. व जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीने संचालक भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करून फरार झाले आहे. या संचालकांना अटक करण्यात यावी, या मागणीला धरून ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. .

जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया लि. व जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीने भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना तीन वर्षात, पाच वर्षात रक्कम दुप्पट करून देण्याचे प्रलोभन या कंपनीच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. सदर रक्कम परत करण्याची वेळ आली असता येथील सर्व पसार झाले. त्यामुळे सदर कंपनीच्या संचालकांविरोधात ६ सप्टेंबर २०१६ रोजी भंडारा पोलिसात तक्रार दाखल करून कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८/३४ नुसार गुन्हा दाखल करून यातील काही गैरअर्जदारांना अटक करण्यात आली तर काही गैरअर्जदार आजही पोलिसांना मिळाले नाही. जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. व जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करण्यात यावी म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशनावर दोनदा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ८ फेब्रुवारी २०१८ रोजी अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करून सदर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. .

मात्र अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांनी अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही व ठेवीदाराची रक्कम परत मिळालेली नाही. त्यामुळे ठेवीदारांना हुतात्मा स्मारक चौक भंडारायेथून विष्णुदास लोणारे, कन्हैया नागपुरे, मधुकर येरपुडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. यात गावा-गावातून गुंतवणुकीदारांनी सहभाग घेतला होता.यावेळी जिल्हाधिकारी शंतनु गोयल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात ठेवीदारांची रक्कम तत्काळ देण्याची कारवाई करावी, फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात यावी, मागणी पूर्ण न झाल्या येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीत सर्व जिल्ह्यातील ठेवीदार बहिष्कार घालतील. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरण समजून अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून तत्काळ माहिती घेऊन पुढील कारवाईसाठी शासनाला पाठपुरावा करतो व लवकरात लवकर रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चात डॉ. राजकुमार बावनकर, ममता सांडेल, अनिल मूर्ती, नलु सेलोकर, ममता साखरे, केशोराव बिसने, ज्ञानेश्वर गजभिये, फुलवंता कोकुडे, जागृती गजभिये, मंगला सातके, अरविंद प्रधान, पूष्पा पटले, जगदिश जनबंधु, लेकचंद लुसेसरी व अन्य ठेवीदार सहभागी झाले होते..