यवतमाळ,दि.20 : ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारतीय पिछडा शोषित संघटनेने सरकारला दिला आहे. मंगळवारी याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गोबरे, बाळूसिंग कडेल, संतोष झेंडे, नंदकिशोर राऊत, माया गोरे, लक्ष्मीकांत लोळगे, संजय ढाकुलकर, नरेश ठाकूर, कल्पना लंगडे, उत्तम गुल्हाणे, डॉ. दिलीप घावडे, रमेश गिरोळकर यांच्यासह भारतीय पिछडा शोषित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.