शहीदांच्या कुटुंबीयांना एक कोटी द्या-आ.गजभिये

0
15

नागपूर,दि.05ः-राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबुरखेडा गावात माओवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाचे १5 जवान शहीद झाले. या सर्व शहीदांच्या कुटुंबीयांना तसेच या घटनेतील वाहन चालक जो जवानांसोबतच शहीद झाला त्याच्या कुटुबियांना प्रत्येकी एक कोटी  देण्यात यावे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.
बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास सी- ६० पथकाचे जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभुरखेडा गावाजवळील पुलावर जवानांचे खासगी वाहन आले असता माओवादींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १६ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. माओवाद्यांच्या कारवाया रोखण्यात सरकार अपयशी झाले असल्याची टीका करत आमदार गजभियेंनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि नोकरीची मागणी रेटून धरली आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात देशात दहशतवादी तसेच माओवाद्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शत्रुंचे मनोधौर्य वाढत आहे. अशा घटनांना चोख प्रत्युतर द्यायला हवे. तसेच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याची, भावना गजभियेंनी व्यक्त केली.