24.3 C
Gondiā
Sunday, July 6, 2025
Home Blog

आषाढी एकादशी च्या मुहूर्तावर विवीध विकासात्मक कामाचे उद्घाटन

0

*जि.प.सदस्य किरण पारधी यांचा पुढाकार
चित्रा कापसे
तिरोडा–तालुक्यातील मिनी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बेलाटी बु.येथे आषाढी एकादशी निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी श्री विठ्ठलरुक्माईची पूजा अर्चना करून अनेक विकास कामाचे भूमिपूजन केले.

भूमिपूजनाचे उद्घाटन टिकास मारून जि प सदस्य किरण पारधी, प.स. सदस्य पिंटू चौधरी, गावातील सरपंच सौ. स्वातीबाई चौधरी, उपसरपंच मोरेश्वर आगाशे, सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी बांधव, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष उपस्थित होते.
या विविध कामांचे भूमिपूजनात जिल्हा परिषद पंधरावे वित्त निधीतून बंदिस्त नाली बांधकाम ५ लाख रुपये, आरो प्लांटचा लोकार्पण (खासदार सुनील मेढे यांच्या प्रयत्नातून) पंचायत समिती निधीतून शौचालय दुरुस्तीचे काम, वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर आगाशे व आभार प्रदर्शन पिंटू चौधरी यांनी केले
याप्रसंगी गाव सदैव सुख शांती समाधानाने व समृद्धीने पूर्ण रहावे म्हणून विठ्ठल रुक्मिणी च्या चरणी गावातील सरपंच उपसरपंच यांनी साकडे घातले.

भुयारी गटार योजनेवर आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा

0

मुख्याधिकारी मालकर व कंत्राटदारांची उपस्थिती
नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांच्या प्रश्नावरही चर्चा
चित्रा कापसे
तिरोडा–भुयारी गटार योजनेच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मालकर तसेच कामाचे कंत्राटदार उपस्थित होते.

बैठकीत नागरिकांनी गटार योजनेमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केली. अनेक रस्ते खोदले गेले असून योग्य दुरुस्ती न झाल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर आमदार श्री. रहांगडाले यांनी स्पष्ट शब्दात कंत्राटदार व प्रशासनाला सूचना दिल्या की काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे.शुक्रवार पर्यंत वेळ देवून रसत्याची डागडुजी करुण सुररित करण्याचे कंट्रातदार ला आमदार यानी बजावले

याच बैठकीत नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था देखील चर्चेचा विषय ठरली. अनेक भागांतील रस्ते खड्डेमय असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी मालकर यांनी दिले.

जनावरांची तस्करी करणारा वाहन जप्त; चालक फरार

0

देवरी- तालुक्यातील मुरदोली गावाजवळ 12 बैल कोंबून भरलेला ट्रक देवरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून वाहन चालक फरार झाला. ही कारवाई शनिवार, 5 जुलै रोजी पहाटे 7.30 वाजता दरम्यान करण्यात आली. पोलिसांनी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. MH 40, D 6035 क्रमांकाची महिंद्रा पिकअप आमगाव आदर्श – मुरदोली मार्गे सुसाट वेगाने देवरी महामार्गाकडे जाताना गस्तीवर असलेले पोलिसांना दिसला. थांबण्याचा इशारा केल्यानंतरही तो भरधाव निघाला. वाहनाच पाठलाग सुरू केला. ताडपत्री झाकून असलेला ह्या ट्रकला देवरी तालुक्यातील महामार्गावरील मुरदोली गावाजवळ शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतला तोपर्यंत चालक पसार झाला होता. वाहनास 12 जनावरे असा अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल देवरी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये देवरी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास सुरूवात केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक प्रविन डांगे यांच्या मार्गदर्शनात पो.ह. परसमोडे, चालक पो.ना. पंकज पारधी, पो.सी. अनिल ऊईके , पो.सी. विनोद बिसेन यांनी केली आहे.

सिटी सर्वे कार्य की हर हफ्ते पेश करें रिपोर्ट : विधायक अग्रवाल

0

गोंदिया : चार साल पूर्व से मंजूर नगर भूमापन (सिटी सर्वे) के मंद गति से चल रहे कार्य पर विधायक विनोद अग्रवाल ने नाराजगी जताते हुए इस कार्य को तीव्र गति देने के कड़े निर्देश दिए।
गोंदिया के उपविभागीय अधिकारी कार्यालय में 4 जुलाई को नगर भूमापन एवं शहर के विभिन्न मुद्दों को लेकर बैठक ली गई। बैठक में एसडीओ चंद्रभान खंडाईत, उप अधीक्षक भूमि अभिलेख अजय शिरसागर, अपर तहसीलदार व मुख्याधिकारी श्रीकांत कांबड़े, तहसीलदार शमशेर पठान, सुनील केलनका, ऋषिकांत साहू, विवेक मिश्रा, जितेश टेंभरे, लीमेंद्र बिसेन, नुरुनाथ दिहारी, नगर रचना विभाग के श्री तुरकर, विश्वजीत मेश्राम सहित अन्य अधिकारियों की उपस्थिति रही। विधायक विनोद अग्रवाल ने इस बैठक में शहरीकरण को लेकर, किये जा रहे नगर भूमापन (सिटी सर्वे) के कार्य की समीक्षा की। सिटी सर्वे कार्य हेतु पुनर्मोजनी, ड्रोन सर्वे, स्पॉट सर्वे के साथ ही शहरी सीमा हद से सटे 7 गाँव फुलचुर, कटंगी, कुड़वा, मुर्री, पिंडकेपार, गोंदिया खुर्द और गोंदिया बुजुर्ग में कितना कार्य किया गया इसकी जानकारी ली। संज्ञान में आया कि सिटी सर्वे एवं पुनर्मोजनी कार्य मंद गति से किया जा रहा है, इस पर विधायक विनोद अग्रवाल ने नाराजगी व्यक्त कर इस कार्य को तेजगति देने के निर्देश दिए। सर्वे में टीम को बढाने , मेप फाइनल करने के कार्य को गति देने और सप्ताह में 200 प्रॉपर्टी के लक्ष्य को पूरा करने के निर्देश दिए। उन्होंने अधिकारियों को यह भी निर्देश दिए कि वो प्रत्येक हफ्ते इस कार्य की बैठक लेकर इसकी रिपोर्ट प्रस्तुत करें।

8 दिन में दूकान/कमरें लीलाव करें..
बैठक में विधायक विनोद अग्रवाल ने नगर परिषद द्वारा बनाएं गए संकुलों के महीनों से बंद पड़े कमरों/गालों को लीलाव न करने पर नाराजगी व्यक्त की। उन्होंने कहा कि, नगर पालिका का ध्यान आमदनी पर नही है, रखरखाव पर नही है। दुकान खाली पड़ी है पर किस वजह से नही दी जा रही समझ से परे है। उन्होंने कड़े निर्देश देकर इनका लीलाव 8 दिन में कर सूचित करने की जानकारी दी।

सफाई पर ध्यान केंद्रित करें…
बैठक में विधायक विनोद अग्रवाल ने मार्केट एरिया में, मटन मार्केट परिसर में फेंके जा रहे वेस्ट मटेरियल और कूड़ा कचरा न उठाने पर गंभीर संज्ञान लिया। उन्होंने कहा कूड़ा कचरा अगर दुकानदार स्वयं अव्यवस्थित रूप से फेकेंगा तो इसका असर पूरे परिसर में दिखाई देगा। मटन और मछली मॉर्केट परिसर में मांसाहार वेस्ट मटेरियल को यहाँ वहां फेकने से परिसर में दुर्गंध फैल रही है। इसका स्वास्थ्य पर बुरा असर पड़ रहा है।

घंटा गाड़ी ख़िरीदी करने के निर्देश…
विधायक विनोद अग्रवाल ने मटन, मछली मार्केट में साफ सफाई का ध्यान रखते हुए एक कचरा गाड़ी खड़ा रखने और वेस्ट मटेरियल उसी में फेकने के दुकानदारों को आदेश देने हेतु सूचित किया। इसके साथ ही बाजार परिसर कचरा संकलन हेतु 10 नई घंटा गाड़ी खरीदने की प्रक्रिया करने के निर्देश दिए।

एम.जी. कृषीतंत्र निकेतनच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये घवघवीत यश

0

गोंदिया,दि.०६ः : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबई, अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कृषी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम. या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल शनिवार 5 जुलै 2025 ला लागला. यामध्ये एम.जी. कृषीतंत्र निकेतन, मुर्री चौकी, गोंदियाच्या निकाल 97 टक्के लागलेला आहे. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या परिक्षे मध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी सौ. मयुरी बघेले या विद्यार्थीनीने 81.56 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याच्या पाठोपाठ आदित्य सुखदेवे 80.11 टक्के, कु. तरू भालाधरे 77.56 टक्के, योगेश हिंगे 75.56 टक्के, रत्नमाला पटले 75.33 टक्के गुण घेऊन यश संपादन केलेला आहे. विदर्भात कृषीतंत्र क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. कृषीतंत्र निकेतनला महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय नौकरीसाठी निवडले जातात. विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय महाविद्यालयाचे संचालक अनील गोंडाणे व पालकांना दिले आहे. या यशासाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. रामेश्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. मनीष चैधरी, प्रा. सौरभ बघेले, प्रा. आकाश श्रोते, प्रा. सम्येक गणवीर, राजु रहांगडाले, राजाभाऊ उंदिरवाडे, श्रीमती योगेश्वरी ठवरे व श्रीमती रूपाली धमगाये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्याची बाम्हणी येथे कृषिभेट

0

गोंदिया, दि.०५- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी काल शुक्रवारी (दि.०४) आमगाव तालुक्यातील बाम्हणी गावातील शेतशिवाराला भेट दिली.

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस सी अवताडे, कार्यक्रम समन्वयक मिथून भगत कार्यक्रम अधिकारी कमलेश चव्हाण सहप्रमुख सुयोग उराडे यांचे मार्गदर्शनाखाली हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सध्या आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना  शेतीविषयक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापन आदी विषयांवर शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन करीत आहेत

.याचाच एक भाग म्हणून कृषिमहाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सृष्टी भदाडे, तेजस्विनी बिसेन, सुहानी भुसारी, विशाखा आंबेडारे, वैदवी भरणे यांनी बाम्हणी येथील शेतकरी कालिचरण भिमटे यांच्या शेतशिवारास भेट दिली. या भेटीत या विद्यार्थिनिंनी त्यांच्या शेतातील शेततळ्याची पाहणी केली. यावेळी श्री भिमटे यांना या विद्यार्थिनींनी जलसिंचनासाठी शेततळे कसे उपयुक्त आहे, ते पटवून देत जलव्यवस्थापनाविषयी त्यांचे मार्गदर्शन केले. यावेळी श्री भिमटे यांनी विचारलेल्या प्रश्नांना या विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांचे शंका समाधान केले. याशिवाय यावेळी त्या विद्यार्थ्यांनी शेतीविषयक माहिती, पर्यावरणाचे महत्व, जैविक तंत्रज्ञान, शेतीचे आधुनिक प्रकार आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एक पेड माॅ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

0

गोरेगाव (प्रतिनिधी) — “एक पेड माॅ के नाम” या अभिनव उपक्रमांतर्गत पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य सी. डी. मोरघडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मातेसम प्रेम व्यक्त करत तिच्या नावे एक झाड लावले. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच मातृप्रेमाचा भावही जपण्यात आला.कार्यक्रमामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पर्यवेक्षक ए एच कटरे यांनी वृक्षांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना दरवर्षी एक झाड लावण्याचे व त्याचे पालनपोषण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संयोजन सौ. ए एस बावनथडे यांनी केले. शेवटी सर्वांनी झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं

0

राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मुंबई:-महाराष्ट्राच्या आजचा दिवस मैलाचा दगड ठरला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित विजय सभेत मराठी एकतेचा विजय साजरा होत आहे.त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीविरोधात ठाकरे बंधूंनी एकजुटीने आवाज उठवला, आणि त्यांच्या दबावामुळे महायुती सरकारने हा निर्णय रद्द केला. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, कारण यातून नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात होईल का, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीसांना टोला लगावला.

त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध

*मराठी भाषेच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंनी त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध केला होता. या सूत्रानुसार, शाळांमध्ये मराठीसह हिंदी आणि इंग्रजीच्या सक्तीमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

राज ठाकरे यांनीही सरकारला कडक इशारा दिला, “तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, पण आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर!” या एकजुटीमुळे महायुती सरकारला माघार घ्यावी लागली, आणि त्रिभाषा सूत्राचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला. ही घटना मराठी भाषिकांसाठी मोठा विजय मानली जात आहे.

राजकीय पक्षाचा झेंडा नाही

वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित विजय सभेचा मुख्य उद्देश मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव करणे हा आहे. या सभेला कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, फक्त मराठी हाच अजेंडा असेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. “कोणत्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगत त्यांनी मराठी एकतेचा संदेश दिला.

कोणत्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आम्ही २० वर्षांनी कोणत्याही व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचं ते फडणवीसांना जमलं, असा टोला राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा,म्हणाले, “दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार”

0

मुंबई:-महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेचा जागर केला आणि सत्ताधारी महायुती सरकारला थेट आव्हान दिलं.वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला. ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

भाषेच्या लढ्याला मोठं यश

महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र मागे घेतल्यानंतर मराठी भाषेच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. “मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता, पण आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना, “महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्यांना आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल,” असा इशारा दिला. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली, तरी मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ताधाऱ्यांना दिलं खुलं आव्हान

या सभेचा सर्वात महत्त्वाचा क्षण होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना दिलेलं खुलं आव्हान. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं, “आम्हाला वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं सत्ताधाऱ्यांचं धोरण होतं. पण आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय, आणि यांना फेकून देण्याची वेळ आली आहे!” त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितलं की, “बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, आणि आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही.” या वक्तव्यातून त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खणखणीतपणे समाचार घेतला.

एकजुटीवर विशेष भर

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या एकजुटीवर विशेष भर दिला. “बऱ्याच वर्षांनंतर मी आणि राज एका राजकीय व्यासपीठावर एकत्र आलोय. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची गरज नाही, आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र राहणार,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सत्ताधारी सरकारवर टीका करताना, “मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही मिळवला, आणि यापुढेही आम्ही लढत राहू,” असं म्हटलं.

ठाकरे बंधूंच्या या एकजुटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ही एकजूट सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. राजकीय विश्लेषकांच्या मते, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मतांमध्ये मोठी फाळणी टळणार आहे. यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

मराठी जनतेला आवाहन

या सभेत मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा संदेश देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेला आवाहन केलं की, “आपण एकजुटीने लढलो तर कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही.” त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना म्हटलं, “आमच्या आजोबांनी भोंदूपणाविरोधात लढा दिला, आणि त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आलोय.”

ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक एकजुटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युगाची सुरुवात झाली आहे. मराठी अस्मितेचा जागर करताना सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारी ही एकजूट आगामी काळात काय परिणाम घडवून आणेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मराठी जनतेसाठी हा क्षण निश्चितच प्रेरणादायी आहे, आणि यामुळे राज्याच्या राजकारणात नवं पर्व सुरू होण्याची शक्यता आहे.

धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून तत्काळ चुकारे द्या – आमदार विजय रहांगडाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

मुंबई | तिरोडा-गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. विजय रहांगडाले यांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील रबी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याची व शेतकऱ्यांचे थकीत चुकारे तात्काळ देण्याची मागणी केली.

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रबी हंगामात धान उत्पादन होते. मात्र, शासनाकडून धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित ठेवले जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करूनही हमीभावाने धान विक्री करण्यास अपयश येते. परिणामी, त्यांना दलालांच्या माध्यमातून कमी दराने धान विकावे लागते. या पार्श्वभूमीवर धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवणे ही काळाची गरज असल्याचे आमदार विजय रहांगडाले यांनी स्पष्ट केले.

तसेच मागील हंगामातील अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे अद्याप देय आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे थकीत चुकारे त्वरित दिले जावेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन या भेटीत देण्यात आले.