31.8 C
Gondiā
Tuesday, May 20, 2025
Home Blog Page 5696

जि.प., पं. समिती निवडणुकांसाठी कार्यक्रम घोषित

0

मुंबई- राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला असून, 25 नोव्हेंबर 2016 रोजी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज (शनिवार) दिली.

श्री. सहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मुदत मार्च 2016 पूर्वी मुदत संपत आहे. तत्पूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील. त्यासाठी सन 2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी 9 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक विभागांमध्ये; तर पंचायत समिती क्षेत्राची निर्वाचक गणांमध्ये विभागणी म्हणजे प्रभाग रचना करतील व त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करतील. या प्रस्तावात अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणाचाही समावेश असेल. विभागीय आयुक्त त्यास 23 सप्टेंबर 2016 पर्यंत मान्यता देतील. 5 ऑक्‍टोबर 2016 रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला आरक्षणाबाबतची जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठीची सोडत जिल्हाधिकारी; तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठीची सोडत तहसीलदारांच्या उपस्थितीत काढण्यात येईल.‘

‘निवडणूक विभाग व निर्वाचक गण; तसेच आरक्षणाबाबतचे प्रारूप 10 ऑक्‍टोबर 2016 रोजी प्रसिद्ध केले जाईल. नागरिकांना 10 ते 20 ऑक्‍टोबर 2016 या कालावधीत संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे हरकती व सूचना त्यावर दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांवर संबंधित विभागीय आयुक्त सुनावणी देतील. त्यानंतर ते 17 नोव्हेंबर 2016 पर्यंत निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची रचना अंतिम करतील. त्यास 25 नोव्हेंबर 2016 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्धी दिली जाईल,‘ असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

जिल्हा परिषदनिहाय सदस्य संख्या (जिल्हा परिषदेचा प्रत्येक निवडणूक विभाग पंचायत समितीच्या दोन निर्वाचक गणांमध्ये विभागण्यात येईल): रायगड- 61, रत्नागिरी- 55, सिंधुदुर्ग- 50, नाशिक- 73, जळगाव- 67, अहमदनगर- 73, पुणे- 75, सातारा- 64, सांगली- 60, सोलापूर- 68, कोल्हापूर- 67, औरंगाबाद- 62, जालना- 56, परभणी- 54, हिंगोली- 52, बीड- 60, नांदेड- 64, उस्मानाबाद- 55, लातूर- 58, अमरावती- 59, बुलढाणा- 60, यवतमाळ- 61, नागपूर- 58, वर्धा- 52, चंद्रपूर- 56 आणि गडचिरोली- 51.

ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

0

नवी दिल्ली, दि. २० – ऊर्जित पटेल यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . विद्यमान गव्हरन्र रघुराम राजन यांचा कार्यकाळ ५ सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्याच पार्शवभूमीवर बँकेचे उप गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
सरकारने गव्हर्नरपदासाठी निश्चित केलेल्या चार जणांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये ऊर्जित पटेल, माजी उप गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांचा समावेश होता. अखेर ऊर्जित यांची रघुराम राजन यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड झाली.

शेळीपालनासाठी माविमची जनजागृती रॅली

0

गोंदिया,दि.२० : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील गरीब कुटुंबियांच्या उपजिविका वाढविणावर व निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. माविमच्या माध्यमातून तालुक्यातील ३७ गावात शेळीपालन उपजिविका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत समुदाय पशुधन व्यवस्थापक व पशुसखींच्या माध्यमातून गरीब शेळीपालकांना कमीत कमी किमतीत चांगल्या प्राथमिक उपचार सुविधा मिळाव्या याकरीता ३७ पशुसखी व ४ समुदाय पशुधन व्यवस्थापक यांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.
सालेकसा तालुक्यातील गरीब कुटुंबियांची उपजिविका मोठ्या प्रमाणात शेळीपालनावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त नागरिकांना शेळीपालनाविषयी माहिती व्हावी, त्यांचे लसीकरण, डी बर्निंग याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून समुदाय साधन व्यक्तीच्या माध्यमातून बचतगटातील महिला, पशुसखी व गावातील नागरिक यांच्या वतीने तालुक्यातील अनेक गावात शेळीपालनावर जनजागृती रॅली काढण्यात आली. या सर्व गावांमध्ये स्वयंसहायता महिला बचतगटातील सदस्य व गावातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅलीदरम्यान शेळीपालन व्यवसायबाबत बकरी गरीब की गाय है, घर मे पाणी पिलाव बिमारी भगाव, दानामिश्रण खिलाव समय बचाव, बधियाकरण कराव बकरेका बजन बढाव, टिकाकरण कराव बिमारी भगाव, बिमा कराव बिमारी भगाव अशा घोषणा देण्यात आल्या.
या रॅलीच्या आयोजनाकरीता माविमचे तालुका व्यवस्थापक अनिल गायकवाड, उपजिविका विकास सल्लागार हंसराज रहांगडाले, समुदाय संघटक संगीता मस्के, शालू साखरे, प्रशांत बारेवार, सहयोगीनी उषा पटले, नयना कटरे, कामेश्वरी गोंडाणे, छाया मोटघरे, अर्चना कटरे, सुशीला बघेले, दुर्गा देशमुख, लेखापाल मुकेश भुजाडे आदी यावेळी उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय पशुधन व्यवस्थापक मेहाचंद ठेकवार, झनकलाल तुरकर, चमरु लिल्हारे, संतोष तुमसरे, देवेंद्र शहारे, पन्नालाल पटले व गावातील पशुसखी, समुदाय साधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.

वंचितांना न्याय देण्यासाठी शासन सदैव कार्यरत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे उद्यान नामकरण

नागपूर, दि 20 : महाराष्ट्र शासन मातंग समाजाच्या विकासासाठी कटिबध्द
आहे. दलित वस्ती सुधार योजना बदलून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे वस्ती सुधार
योजना सुरु केली असून दलित व वंचितांकरिता हे राज्य सदैव कार्यरत राहील
असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर येथील महानगरपालिकेच्या वतीने अंबाझरी उद्यानात आयोजित आद्य
क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस
यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ट वाहतूक
मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर
प्रविण दटके, आमदार सर्वश्री मिलिंद माने, सुधाकर देशमुख, अनिल सोले,
तसेच दयाशंकर तिवारी, संदीप जाधव आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 13 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर महापालिकेने या
उद्यानारचे आद्य क्रांतीगुरु लहूजी साळवे उद्यान असे नामकरण केले. लहुजी
साळवेंचा सुंदर पुर्णाकृती पुतळा बसविला, त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन
केले. लहुजी साळवे हे शूर लढवय्ये होते. त्यांचे संपूर्ण घराणे
स्वराज्याच्या स्थापनेत लढणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात
शूर सैनिक म्हणून भाग घेतला. शिवाजी महाराजांनी पुरस्कृतही केले होते.
हिंदवी स्वराज्याच्या लढाईत इंग्रजांविरुध्द प्राणपणाने ते लढले. इंग्रज
सैनिकही त्यांच्या चपळाई पाहून अवाक व्हायचे.

मुख्यमंत्री म्हणाले की, स्वाभिमानाने जगायचे तर अगोदर व्यायाम आवश्यक
आहे म्हणून पुण्यात पहिली तालिम लहुजींनी सुरु केली. क्रांतीगुरु म्हणून
लहुजी साळवे सुपरिचित होते. शस्त्रास्त्र व तालिमिचे धडे तरुणांना
त्यांनी दिले. महात्मा फुले यांच्या शिक्षण कार्यात सक्रीय सहभाग म्हणून
लहुजींनी पहिल्यांदा आपली कन्या शाळेत पाठविली. महात्मा फुलेंना
सर्वप्रथम संरक्षण लहुजी साळवे यांनी दिले. स्वातंत्र्याच्या लढ्यात
साळवेंचे योगदान मोठे होते. त्यांची प्रेरणा आपणास सदैव मिळत राहील.
प्रत्येकास स्वातंत्र्याचे मोल समजावे म्हणून महापालिकेने लहुजी साळवेंचा
पुतळा उभारुन उत्कृष्ट कार्य केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले
की, आपणास स्वराज्य मिळाले आहे, आता प्रत्येकाने सुराज्याकडे वाटचाल
करण्यासाठी संकल्प करावा.

राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, एकोणिसाव्या शतकातील एक
महाराष्ट्रीय क्रातिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक, लहुजी वस्ताद
या नांवानीही ते परिचित होते. त्यांचे घराणे राऊत या नांवाने ख्यातनाम
होते. त्यांचे घराणे धाडसी व देशभक्त परिवार म्हणून ओळखले जात. युवक
युवतींनी स्वावलंबी होण्यासाठी महामंडळाचे कर्ज घेऊन सन्मानाने जीवन
जगावे. शासनातर्फे नागरिकांना घरे बांधून देण्यात येणार असून त्यामध्ये
मातंग समाजांनाही घरे उपलब्ध करुन देण्यात येईल. यावेळी महापौर प्रविण
दटके यांनी आपल्या भाषणात लहुजी यांच्या कार्याचा आढावा घेतला.

विमानसाठीच्या निर्माण उद्योगामध्ये नागपूर हे जगातील प्रमुख केंद्र-मुख्यमंत्री फडणवीस

0

नागपूर, दि 20 : बोईंग विमानासाठी टाटा उद्योग समूहाच्या ‘ताल’मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन उद्योग समूहातर्फे अत्यंत उच्च दर्जाचे फ्लोअर बिम निर्माण करुन मिहानचे नाव जागतिक स्तरावर पोहचविले असून बोईंग एमआरओ व ताल उद्योग समूहामुळे विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती व देखभालीसाठी जगातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे प्रतिपादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मिहान येथे टाटा उद्योग समूहाच्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोलुशनतर्फे ड्रीमलायनर 787 या बोईंग विमानासाठी निर्माण केलेल्या पाच हजाराव्या फ्लोअर बिमच्या पुरवठा संदर्भातील कन्साईनमेंटचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती विभाग जेनेरिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, बोईंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, पद्मश्री डॉ. रघुनाथ माशेलकर, खासदार कृपाल तुमाने, तालचे चेअरमन आर. एस. ठाकूर, टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक गुंटेर बस्चेक, कार्यकारी संचालक राजेश खत्री आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

एअरो स्पेस इको सिस्टिमसाठी मिहान येथे जागतिक स्तराच्या आवश्यक सर्व सुविधा निर्माण झाल्या असल्यामुळे टाटा उद्योग समूहाचे तालतर्फे बोईंग 787 या विमानासाठी फ्लोअर बिम निर्माण करुन नागपूरचे नाव जागतिक स्तरावर पोहचविल्याबद्दल विशेष अभिनंदन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोईंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांच्या प्रयत्नामुळे एमआरओ नंतर ‘ताल’ सुरु झाले आहे. ताल हे मिहानसाठी ब्रँड अम्बॅसेडर ठरणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या संकल्पनेतील नागपूर हे मेड फॉर वर्ल्ड झाले आहे.

एअर बससाठी आवश्यक असणारे सुटे भाग सुद्धा निर्माण करणारी ‘ताल’ हीजगातील एकमेव कंपनी असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,नागपूर येथील युवकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बोईंगसाठी लागणारे महत्त्वाचे फ्लोअर बिम तयार करण्यासाठी सहभाग दिला असून युवकांचे अभिनंदन करतांना जागतिक स्तरावरील उत्पादनासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ
नागपूरसह विदर्भात असल्यामुळे जागतिक स्तरावरील एव्हिएशन कंपनी तसेच प्रवासी विमाने मिहान येथील एमआरओमध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी येणार असून यासंदर्भात स्पाईस जेटसोबत करार करण्यात आला आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान येथे तालसारख्या जागतिक दर्जाच्या उत्पादन निर्मिती उद्योगामुळे नागपूर जागतिक स्तरावर पोहचले असून बोईंग देखभाल व दुरुस्ती केंद्रामुळे या क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. नागपूर परिसरातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे विमानसाठी लागणाऱ्या सुट्या भागाच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे. उद्योग सुरु करतांना प्राधान्याने स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या संकल्पनेनुसार 50 हजार युवकांना रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. मिहानमध्ये सीप्लेन तयार
करण्यासोबत सरंक्षण उत्पादनाला सुरुवात करावी. केंद्र व राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बोईंगच्या विक्री विभागातील वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी मिहान येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे येरोस्पेस उपयोगासोबतच विमानासाठी लागणाऱ्या सुट्टयाभाग निर्मितीमध्ये नवे दालन येथे निर्माण झाले आहे. मोहिमच्या ड्रिमलायनर 787 या विमानासाठी प्लोअर बिम तयार करताना त्याची गुणवत्ता व दर्जा उत्तम ठेवल्यामुळेच जगात नागपूर
हे केंद्र महत्वाचे ठरले आहे. मोहिम देखभाल दुरुस्तीचे केंद्र तसेच ताल हे विमानाचे सुट्टयाभाग निर्मितीचे केंद्र सुरु करुन येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मी ज्या शहरात शिकलो त्या मातीचे ऋण मी फेडू शकला याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ताल चे कार्यकारी संचालक तथा सीइओ राजेश खत्री यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात बोईंगसाठी आवश्यक असणाऱ्या प्लोअर बिमची निर्मिती पहिल्या 22 महिण्यातच करण्यात आली असून 5 हजारावे प्लोअर बिम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोईंग अमेरिकेला पाठविण्यात येत आहे. 300 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या या उद्योगामध्ये अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तसेच तज्ज्ञ 550 कौसल्यपूर्ण तज्ज्ञ कर्मचारी कार्यरत आहेत. 80 टक्के स्थानिक कौसल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिका वगळता
जगातील ताल ही एकमेव कंपनी बोईंगच्या 787, 9 आणि 787-10 ड्रिमलायनर विमानासाठी सुटे भाग पुरवित आहेत. बोईंगसोबत सहकार्य करुन जागतिक गुणवत्तेनुसार सुट्टेभाग पुरविणारी ही संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.

तिरंगा यात्रेने संचारला देशभक्तीचा उत्साह

0

गोंदिया – देशाच्या स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षानिमित्त ‘आझादी ७०, याद करो कुर्बानी’ या उपक्रमाअंतर्गत १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचे आयोजन केले जात आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली देण्याचा हा कार्यक्रम आहे. या अंतर्गत गोंदिया शहरात खासदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात १९ ऑगस्ट रोजी भव्य मोटरसायकल रैली काढण्यात आली. हातात तिरंगा घेतलेल्या शेकडो युवकांद्वारे ‘भारत माता कि जय’ च्या जयघोषाने शहरात राष्ट्रभक्तीचा एकच जोश व उत्साह दिसून आला. जागोजागी आतिषबाजी व हार घालून रैली चे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान खासदार पटोले यांनी शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
तिरोडा येथून दुपारी ४ वाजता खा नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रेचे गोंदिया येथील कुडवा येथे आगमन झाले. या वेळी उपस्थित जनसमुदायातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी झेंडी दाखवून तिरंगा यात्रेचे शुभारंभ केले.

साकोलीत शेतकर्यानी काढली शासनाची शवयात्रा

0

साकोली,दि.20-गेल्या तीन दिवसापासून येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण कपनीच्या कार्यालयासमोर भारनियमनासह कृषीपंपाला विज पुरवठा करण्याच्या मागणीला घेऊन शेतकर्यानी सुरु केलेल्या आंदोलनाकडे शासनासह लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी दुर्लक्ष केले.अखेर शासन दखल घेत नसल्याचे बघताच आंदोलनकारी शेतकरी वर्गाने आज शनिवारला साकोली व सेंदुरवापा भागात शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी शासनाचीच शवयात्रा वाजत गाजत काढली.विशेष यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते.

कोठडीतील आरोपी महिलेवर बळजबरीचा प्रयत्न :फौजदार निलंबित

0

पोलीसांत अद्यापह गुन्हा दाखल नाही

गोरेगाव,दि.20- गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी महिलेवर तेथील सहाय्यक फौजदाराने बळजबरी करण्याचा प्रयत्न 9 आॅगस्टच्या रात्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ठाण्यातील महिला पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रयत्न अयशस्वी झाला. ९ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेबाबत पोलीस विभागाने गुप्तता पाळत त्या फौजदारावर गुन्हा दाखल न करता त्याला १६ ऑगस्टला निलंबित केले.ग्यानिराम जिभकाटे (बक्कल नं.९९) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे अशाच एका प्रकरणात यापूर्वीही त्याच्यावर कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा त्याला सेवेत नियमित करण्यात आले होते.
गोरेगाव तालुक्याच्या जांभळी येथील जंगलात ३१ जुलै रोजी बोंडगावदेवी येथील एका विवाहित युवकाचा खून झाला होता. त्या खुनात इतर दोघांसह आरोपी म्हणून मृत युवकाच्या पत्नीलाही ६ ऑगस्ट २0१६ रोजी अटक झाली होती. त्या महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. १0 ऑगस्टपर्यंत ती पोलीस कोठडीत असताना तिच्या सुरक्षेसाठी दोन महिला पोलीस शिपाई मंजुषा घरडे व घनमारे ह्या सेवेत होत्या. सोबतच पोलीस ठाण्यात रात्रपाळीत कर्तव्यावर असलेला सहाय्यक फौजदार ग्यानिराम जिभकाटे हा होता.
आरोपी महिला पोलीस ठाण्याच्या एका खोलीत असताना ९ ऑगस्टच्या रात्री जिभकाटे याने त्या महिलेच्या खोलीचे दार वाजवून तिला उठविले. तुझ्याकडे असलेली मुलगी कुणाची, तिला बापाचा दर्जा मी देईन,यासाठी तू माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर,अशी मागणी त्याने केली. त्यानंतर त्या महिलेवर पोलीस ठाण्यातच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

सर्वसामान्य लोकांच्या संदर्भात साधी तक्रार आली की चौकशी न करताच अनेक वेळा पोलीस गुन्हा दाखल करतात. परंतु चक्क पोलीस ठाण्यात दोन महिला पोलीस कर्मचारी हजर असताना एखाद्या आरोपी महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. पोलीस विभाग बदनामीच्या भीतीपोटी गुन्हा दाखल करीत नाही किंवा आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा गोरेगावच्या पोलीस स्टेशन परिसरातच सुरु आहे.

बिहारमध्ये राजद नेत्याची गोळ्या घालून हत्या

0

वृत्तसंस्था
भागलपूर – बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया येथे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते विनोद यादव यांची आज (शनिवार) सकाळी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली.

नवगछिया नगर पंचायतीचे सदस्य असलेले विनोद यादव यांच्यावर आज सकाळी सातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर नवगछियामध्ये तणाव असून, गावातील सर्व व्यवहार बंद आहेत. हल्लेखोर दुचाकींवरून आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. विनोद यादव यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वीच पाटणातील दानापूर भागात भाजप नेते अशोक जयस्वाल यांची हत्या करण्यात आली होती.

झा़डीपट्टी कलावंत कमलाकरचे निधन

0

चंद्रपूर,दि.20-झाडीपट्टी नाटयक्षेत्रातील नामवंत कलाकार कमलाकर बोरकर यांचे आज(दि.20) हृदयविकाराने निधन झाले.बोरकर यांच्या निधनाने झाडीपट्टीतील एक चांगला कलावंतापासून झाडीपट्टी रंगभूमी मुकली आहे.कमलाकर बोरकर हे समाजसेवा विद्यालय वाढोणा येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत होते.त्यांच्या निधनाबद्दल झाडीपट्टी रंगभूमीचे कलावंतासह, मराशिप जिल्हा चंद्रपुर आणि नागपूर विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या.