30.3 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 6498

आमदार निधीतून मतदारसंघाचा विकास केला-आ.बडोले

0

नवेगावबांध- अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने २००९ च्या निवडणुकीत मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोचलो. त्या जनतेच्या भावनांचा आदर आणि विकासाची कास ओळखून आपल्या स्थानिक विकास निधीतून पहिल्या पंचवार्षिक कार्यकाळात आपण मतदार संघाचा विकास केल्याचा दावा आमदार राजकुमार बडोले यांनी केला.
समाजमंदिर, रस्ते, आरोगयसेवा, सभामंडप, हातपंप,सिमेंट रस्ते,बुद्धविहार आदीसोबतच रखडलेल्या सिचनाचे प्रकल्प व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांनी मतदारसंघातील आपल्या केशोरी,चिखली,नवेगावबांध आदी गावांना दिलेल्या भेटीदरम्यान मतदारांशी संवाद साधताना सांगितले.
देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने चांगले कार्य करण्यास सुरवात केली असून अवघ्या १०० दिवसातच महागाईसुद्धा आटोक्यात आणली. qसचनासाठी केंद्राकडून सहकार्य मिळत असून गोंदिया-कोहमारा -वडसा या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाचे मार्ग मोकळे केल्याचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना आमदार बडोले म्हणाले की, झाशीनगर उपसा सिचन योजनेतून नवेगावबांध तलावात येत्या मार्च २०१५ पर्यंत पाणी पाडून शेतीला पाणी मिळवून देण्याकरिता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वन व कृषी उत्पादनावर आधारित औद्योगिक विकासाकरिता लघुउद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मितीकरिता प्रोत्साहन देण्यासाठी कट्टीबध्द आहे
इटियाडोह धरणाचे पाणी झरी उपसा qसचन योजनेद्वारे बोंडगावदेवी परिसरातील शेतीला पोचविणे, नरेगा योजनेतून शेतीची कामे व्हावी यासाठी राज्यसरकारकडे प्रयत्न केले असून आदिवासी बहुल भागातील मागास प्रवर्गातील विद्याथ्र्यांना व बेरोजगारांना शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी डव्वा येथे शासनाच्या वतीने मागासवर्गीय निवासी वसतिगृह व शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुढच्या पाच वर्षात विकासाची कामे करण्यासाठी पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.

प्रफुल्ल पटेल यांचा प्रचार दौरा

0

गोंदिया- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात दौèयावर येत आहे. ते विविध ठिकाणी प्रचारसभांना संबोधित करतील. ५ ऑक्टोबर रोजी ते सकाळी ११ वाजता लाखांदूर तालुक्यात,दुपारी धारगाव व नंतर दुपारी ३.३० वाजता मुंडीकोटा (ता. तिरोडा),त्ङ्मानंतर तु‘सर तालु्नङ्मातील सिहोरा येथील सभेला मार्गदर्शन करणार आहेत.

भंडा-यात उद्धव ठाकरेंची सभा रविवारी

0

भंडारा- येत्या १५ ऑक्टोबरला होणाèया महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्याच्या दौèयावर आहेत. स्थानिक दसरा मैदानात रविवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत भंडाराचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर,तुमसरचे इंजि.राजेंद्र पटले, साकोलीचे प्रकाश पडोळे,अर्जुनी मोरगावच्या किरण कांबळे, तिरोड्याचे पंचम बिसेन, गोंदियाचे राजकुमार कुुथे आणि आमगाव येथील शिवसेनेचे उमेदवार मूलचंद गावराने यांच्या संयुक्त प्रचार सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत.

नरेंद्र मोदी रविवारी गोंदिया

0

गोंदिया- महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. मोदी यांची सभा गोंदियाच्या इंदिरा गांधी स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली असून या सभेत गोंदिया जिल्ह्यातील गोंदियाचे भाजप उमेदवार विनोद अग्रवाल,अर्जुनी मोरगावचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले,तिरोड्याचे विजय रहांगडाले आणि आमगावचे उमेदवार संजय पुराम यांच्या संयुक्त प्रचार सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत.

विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या-पटेल

0

गोंदिया-सध्या राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्वत्र धामधूम आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे ही निवडणुक लढवित आहेत.त्यातच काँग्रेससोबतची आघाडी तोडून राष्ट्रवादीने सुुध्दा स्वबळावर शक्ती आजमिवण्याचे निश्चित केले आहे.राष्ट्रवादीची धुरा माजी केंद्रीय मंत्री खासदार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर आहे.
विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दि१⁄२गज मतदारांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले आहेत.प्रत्यक्ष संपर्क, व्यूहरचना, आग ओकत असलेला सूर्य आणि यामुळे येणारा शारीरिक थकवा आणि मानसिक त्रास, यामुळे प्रत्येक उमेदवार हैराण असल्याचे चित्र दिसायला सुरवात झाले आहे. या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या हातात प्रचाराची धुरा घेतली आहे.
उमेदवारी अर्ज सादर करण्ङ्माच्ङ्मा दिवसापासूनच राष्ट्रवादीच्ङ्मा प्रत्ङ्मेक काङ्र्मकत्ङ्र्माा त्ङ्मांनी सजग राहून पक्षाचा चिन्ह घराघरापङ्र्मंत पोचविण्ङ्माचे निर्देश दिले.विशेष म्हणजे भाजप‘धून राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेल्ङ्मा नेत्ङ्मांना उ‘ेदवारी देऊन त्ङ्मांचा उ‘ेदवारी अर्ज दाखल करतेवेळी स्वत पटेलांनी हजेरी लावून विधानसभेच्ङ्मा निवडणुकीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे.
खासदार प्रङ्कुल पटेल ङ्मांनी तिरोडा ‘तदारसंघातील राष्ट्रवादीच्ङ्मा उ‘ेदवार राजलक्ष्‘ी तुरकर,साकोलीचे राष्ट्रवादीचे उ‘ेदवार सुनिल ङ्कुंडे व अर्जुनी ‘ोरगावचे राष्ट्रवादीचे उ‘ेदवार ‘नोहर चंद्रिकापुरे ङ्मांच्ङ्मा प्रचारानि‘ित्त राष्ट्रवादी काँग्रेस काङ्र्मकत्ङ्र्मांच्ङ्मा सभेला ‘ार्गदर्शन करतांना ङ्मावेळी आपली ताकद दाखवून देण्ङ्माची वेळ आली आहे.जी चूक लोकसभेच्ङ्मा निवडणुकीत झाली ती चुक पुन्हा होता का‘ा नङ्मे ङ्मासाठी काङ्र्मकत्ङ्र्मांनी सजग राहून विकास कोण कुठला पक्ष करु शकतो हे दाखविण्ङ्माची वेळ असल्ङ्माचे म्हणाले.
तिरोडा ‘तदारसंघाचा आज जो काही काङ्मापालट झालेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्ङ्मा प्रङ्मत्नाने झाला आहे.अदानीचा विज प्रकल्प असो की धापेवाडा उपसा सिचंन ङ्मोजनेसारखे ‘ोठे प्रकल्प पुर्णत्वास ङ्मेऊन qसचनाची सोङ्म होऊ लागली आहे.तिरोड्याच्ङ्मा नगरपालिकेला ‘हत्व देऊन शासकीङ्म ङ्मंत्रणेचा निधी उपलब्ध करुन दिल्ङ्मा‘ुळे आज शहराच्ङ्मा विकासात भर पडली आहे.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब केंद्रात कृषी ‘ंत्री असताना शेतकèङ्मावर अन्ङ्माङ्म झाला नाही.
धानाचे ह‘ीभाव असो की बोनस नेह‘ीच ‘दत केली परंतु ज्ङ्मा भाजपवाल्ङ्माने धानाला ३००० रुपङ्मे क्विटंल दराची ‘ागणी करीत आंदोलने केली होती त्ङ्माच भाजपच्ङ्मा केंद्रातील ‘ोदी सरकारने धानाच्ङ्मा कि‘तीवर किती रुपङ्माचे बोनस देऊन बोळवण केली हे तुम्हाला ठाऊक आहे.अच्छे दिनचे स्वप्न दाखवून ङ्मा देशाचे वाटोळे कराङ्मला ङ्मेथील भाजप सरकार निघाली आहे.
आ‘च्ङ्मावर दोषारोप करणारे आताचे खासदार कितीदा तु‘च्ङ्मा भेटीला ङ्मेऊन गेले किती का‘े केली ङ्मा सर्व गोष्टींचा विचार करा आणि विरोधी पक्षाच्ङ्मा अच्छेदिनला बळी न पडता निर्भङ्मपणे राज्ङ्मात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्ङ्मासाठी गोंदिङ्मा जिल्ह्यातीलच नव्हे तर भंडारा जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसच्ङ्मा उ‘ेदवारांना निवडून आणण्ङ्मासाठी पक्षाच्ङ्मा नेत्ङ्मांसह काङ्र्मकत्ङ्र्मांनी का‘ाला लागावे असे आवाहन पटेल ङ्मांनी केले.

नाराजगटाची झाली बैठक

0

लाखनी- नागपुरातील भाजप नेत्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील एकेक नेत्याला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा एककलमी कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाचा धसका जिल्ह्यातील ओबीसी बहुजन समाजातील भाजप नेत्यांनी चांगलाच घेतला आहे. तिरोड्यातून डॉॅ.बोपचेंच्या उमेदवारी कपातीनंतर तर भाजपमधील नाराजगटाची गुप्त बैठक पार पडली. गोंदिया मतदारसंघात ओबीसींवर झालेल्या अन्यायाबद्दलच नव्हे तर तिकीट वाटपात सुद्धा दोन्ही जिल्ह्यात चांगल्या उमेदवारांना डावलण्यात आल्यावर चर्चेची खलबते सुरू झाली.
या बैठकीची हवा संघटन मंत्र्याना लागताच म्हणे आशिष वांदिले व उपेंद्र कोठेकर नामक व्यक्तींनी झाले गेले विसरून जा, आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी कामाला लागण्याच्या केलेल्या विनंतीला सुद्धा त्या नाराज गटातील आजी माजी सर्वच आमदार, खासदार,जि.प.पदाधिकाèयांनी लाथाळल्याचे समजते.

फडणवीस : संपत्ती ४ कोटींच्यावर

0

नागपुर-भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती चार कोटी ६७ लाख ३६ हजार ३३६ असल्याचा उल्लेख केला. २००४ मध्ये फडणवीस यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती ३४ लाख ९९ हजार ९५० असल्याचा उल्लेख केला होता.
उमेदवाराला उमेदवारी अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा अहवालच सादर करावा लागतो. यानुसार २००४ मध्ये तेव्हाच्या पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपली संपत्ती ३४ लाख ९९ हजार ९५० असल्याचा उल्लेख केला होता.
यंदाच्या निवडणुकीत फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात स्वतःच्या नावे दोन कोटी चार लाख १४ हजार १३० कोटी रुपयांची आणि पत्नीच्या नावे दोन कोटी ६३ लाख २२ हजार २०६ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा उल्लेख आहे. २००४ मध्ये फडणवीस यांच्यावर ५ लाख ४८ हजार १९५ रुपयांचे कर्ज होते. २०१४ मध्ये १० लाख १९ हजार ४९८ रुपये कर्ज असल्याचा उल्लेख आहे. बाजारमूल्य वाढल्याने आणि रेडीरेकनरच्या वाढीव दरामुळे आपल्या संपत्तीत वाढ झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
१४ हजार रुपयांची बुलेट
फडणवीस यांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात १० लाख रुपयांची महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ही गाडी आहे. यासह मोटरसायकल बुलेट असल्याचाही त्यात उल्लेख आहे. मात्र, ही बुलेट केवळ १४ हजार रुपयांची असल्याचा उल्लेख आहे.

काँग्रेससह भाजपला महिलांची एलर्जी सेनेसह राष्ट्रवादीने दिले महिला उमेदवार

0

गोंदिया-महिला सशक्तीकरणाचे राजकारण करणारे आणि महिलांच्या स्वाभिमानासाठी देखावा करणाèया काँग्रेस आणि भाजपने जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवार न दिल्याने गोंदिया-भंडारा या प्रमुख पक्षांना महिलांची एलर्जी असल्याची भावना जिल्ह्यातील महिलांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादीने महिला उमेदवार उभे दिल्याने महिलांच्या सन्मानाची या पक्षांनी दखल घेतल्याविषयी महिलांमध्ये आशा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातून महिला आमदार निवडून विधानसभेत गेल्याशिवाय महिलांच्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही, यासाठी महिलाशक्तीने एकजूट होण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघाकरीता येत्या १५ आक्टोबरला निवडणूक होऊ घातली आहे. उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी महिलांबाबतीत उदासीन धोरण आखल्याचे चित्र आहे. ज्या काही महिलांना उमेदवारी मिळाली, त्या महिलांना अखेरच्या क्षणी म्हणजे कुणी उमेदवारी घ्यायला तयार नाही म्हणूनच दिली की काय, अशी अवस्था आहे. ४ विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतला, तर राष्ट्र‹वादी, शिवसेना आणि बसपनेच महिला उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा महत्वाचा मतदारसंघ असून या मतदारसंघात भाकपवगळता कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाने उमेदवारी महिलांना देण्याचे धाडस दाखविले नाही. काँग्रेस,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस सेनेकडे महिलांची मोठी संख्या असतानाही महिला उमेदवारांना डावलण्यात आले. तिसरी आघाडी असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कुडव्याच्या सरपंच करुणा गणवीर यांना उमेदवारी दिली आहे.
तिरोडा मतदारसंघात भाजपकडे सीता रहागंडाले यांच्या सारख्या मातब्बर महिला आघाडीच्या नेत्या असतानाही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. काँग्रेस,सेनेने सुद्धा याकडे लक्ष दिले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर यांना उमेदवारी देऊन आपण महिलांना संधी दिल्याचे दाखविले. ४ पैकी १ जागा देऊन तीर मारल्याचा आव राष्ट्रवादी करीत असली तरी अखेरच्या क्षणी कुणी तयार न झाल्यानेच ही उमेदवारी देऊन राजलक्ष्मी तुरकर यांचा या निवडणुकीतून राजकीय बळी घेण्याचाच प्रयत्न होतो की काय, याकडे लक्ष लागले आहे.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघात भाजप,काँग्रेस व राष्ट्रवादीकडून महिलांनी उमेदवारी मागितली. परंतु, त्या पक्षातील नेत्यांनी त्या महिलांकडे दुर्लक्ष केल्याने अखेरच्या क्षणी युती तुटल्याने शिवसेनेने मात्र भाजपच्या जि.प.सदस्या किरण कांबळे यांना आपल्या तंबूत ओढून त्यांना उमेदवारी देऊन अर्जुनी मोरगावच्या विधानसभा निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे.किरण कांबळे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष राहून १० हजार मते घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या चिन्हावर रिंगणात असल्याने आणि नेहमी संपर्कात असल्यानेच शिवसेनेला संजीवनी मिळाली आहे. किरण कांबळेच्या रूपाने या मतदारसंघात शिवसेना आपले स्वप्न साकारण्याची तयारी करीत आहे. काँग्रेसच्या वालदे,भाजपच्या रूपाली टेंभुर्णे यांना मात्र हिरमुसले व्हावे लागले आहे.
आमगाव मतदारंसघाचीही परिस्थिती अशीच असून भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महिलांकडे दुर्लक्ष केले. या मतदारसंघात बहुजन समाजपक्षाने शारदा उईके यांना उमेदवारी देऊन महिलांना संधी दिली आहे.

मातब्बर नेत्यांचे केले भाजपने खच्चीकरण?

0

‘वापरा आणि फेका’ तंत्रामुळे शिवणकर,बोपचे,पटले,आस्वले अडगळीत

गोंदिया- गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आणि कार्याचा आढावा घेतल्यास या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला उभारी देण्यामध्ये कुणबी,पोवार,कोहळी या समाजाचा महत्त्वपूर्ण असा वाटा आहे. या समाजाला नेतृत्व करण्याची संधीही भाजपने दिली आहे, हेही खरे आहे. मात्र, राजकारणात भाजप व्यवस्थित सेट होताच पक्षाचा मनुवादी चेहरा समोर आला. ज्या लोकांच्या भरवशावर पक्ष रुजला त्याच समाजातील नेत्यांना आता वाळीत टाकत त्या-त्या समाजात भांडणे लावण्याचे षडयंत्र नागपुरातील मंडळी करीत आहे. परिणामी, वापरा आणि फेका हे तंत्र भाजपचे तंत्र असल्याची भावना आता हळूहळू लोकांना कळायला लागली असल्याचे बोलले जात आहे.

भूतकाळात डोकावून पाहिले तर संघाची कर्मभूमी असतानाही हा पक्ष या दोन्ही जिल्ह्यात जवळपास नामशेष असाच होता. ज्या समाजाकडे पक्षाची कोअर जबाबदारी आहे, त्या समाजातील एकाही नेत्याने या भागात पक्षवाढीचे प्रयत्न केले नाही वा त्यांना ते जमले नाही. यामुळे बहुजन समाजातील काही मोजक्या लोकांना फितवून या लोकांनी या भागात भाजप वाढीसाठी म्होरके हेरले. परिणामी, ओबीसी समाजातील नेते हळूहळू या पक्षात गोळा व्हायला सुरवात झाली. एेंशीच्या दशकापासून भाजपचा आलेख सतत चढता ठेवण्यात ओबीसी समाजातील नेत्यांचा वापर संघातील तथाकथित मनुवाद्यांनी केला.

राज्यात जेव्हा युतीची सत्ता आली, तेव्हा महादेवराव शिवणकरांना मंत्रिपद मिळाले खरे. परंतु, त्याचवेळी त्यांच्या खच्चीकरणालाही सुरवात करण्यात आली. त्यांच्यामागे अनेक गोष्टींचा चांगलाच ससेमिरा लावण्यात आला होता. बहुजन ओबीसीतील कणखर चेहरा म्हणून गोपीनाथराव मुंडे आणि महादेवराव शिवणकरांचीच ओळख होती. शिवणकरांचे वाढते वजन नितीन गडकरींना कधीच आवडले नाही. त्यांनी त्यांच्या खच्चीकरणाला सुरवात केली. त्यातच २००९ च्या निवडणुकीत विधानसभेच्या मतदारसंघाची फेररचना झाली. त्यामुळे भाजप मधील ओबीसी विरोधी कंपूलाला शिवणकरांच्या राजकीय कारकिर्दीलाच ग्रहण लावण्याची संधीच सापडली. त्यांच्यासारख्या मातब्बराला विधानपरिषदेत जाण्यापासून रोखण्यात नागपूरच्या मंडळीला यश आले. प्रा. शिवणकर हे भाजप सोडून बाहेर जाण्यासाठी नाना प्रयोग या मंडळींनी केल्याचेही सांगितले जाते. शिवणकरांना अडगळीत टाकल्यानंतर या जिल्ह्यात त्यांच्यानंतर नंबर लावला गेला तो डॉ.खुशाल बोपचे यांचा. डॉ. बोपचे हे तर अगदी बालपणापासून संघाच्या मुशीत वाढलेले सच्चे कार्यकर्ते होते. त्यांची गत तर नागपुरातील मंडळींनी शिवणकरांपेक्षाही वाईट करण्यावर भर दिला गेला. त्यांनाही आता मतदारसंघातील मतदारांच्या विरोधाचे खोटे कारण समोर करून निवडणुकीत बाद करीत अडगळीत टाकले गेले. गडकरींशी कितीही बोपचेंचे चांगले संबंध असले,तरी ते कामी आले नाही. तरी गडकरी आणि प्रफुल पटेल यांच्या व्यापारी मैत्रीपोटी बोपचेंचा घात झाला, हेही तेवढेच खरे. त्यातही भाजपच्या संघटनमंत्री असलेल्या आशिष वांदिले यांनी तर आधीपासूनच बोपचेंना टार्गेट केले होते. असेही वांदिले हे संघटन मंत्री कमी आणि भांडणतंटेमंत्री म्हणूनच भाजपत ओळखले जातात. परंतु, आता काय करणार, नागपूरच्या तिकडींने ओबीसी आणि पोवार समाजातील मोठ्या नेत्याचेही खच्चीकरण करून टाकले आहे. या आधी माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार हेमंत पटले,मधुकर कुकडे,खोमेश्वर रहांगडाले, हरीश मोरे यांना सुद्धा मोठे लालीपाप देण्यात आले. परंतु, त्यांनाही वाळीत टाकण्यात आले. तीच परिस्थिती माजी आमदार राम आस्वले, हेमकृष्ण कापगते यांचीही आहे. भाजपमधील या मनुवाद्यांनी हेटाळणी करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. दादा टिचकुले, राजेंद्र पटले, नेतराम कटरे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, वसंता एंचिलवार, महेंद्र निबांर्ते, प्रकाश पडोळे अशी अनेकांची नावे आहेत ज्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आणण्यात संघटनमंत्र्याची मोलाची भूमिका आहे.

ज्या भाजपला पूर्व विदर्भात चांगला जम बसवून दिला त्याच भाजपने जर दगा दिला असेल, तर शिवणकर, बोपचे, पटले, रहांगडाले, कापगते, टिचकुले, पडोळे आदींनी सुद्धा संघटित होऊन आपली बहुजन शक्ती त्या संघटनमंत्र्याला नव्हे तर भांडणमंत्र्याला दाखविण्याची संधी या नेत्यांकडे चालून आली आहे.

अन्यथा आताही गप्प बसले समाजातील कच्च्या दुव्यांचा वापर आणि आपल्या पक्षवाढीसाठी केलेल्या श्रमाचा भरपूर वापर करून ही मंडळी मोकळी होईल. आणि पुन्हा नवीन शिवणकर, बोपचे पटले, रहांगडाले, कापगते यांचा बळी घेत ही मंडळी सत्तासुख उपभोगतील आणि ओबीसी समाज हा युगानुयुगे पुन्हा गुलामीत ठेवण्याचा त्यांच्या मनसुब्याला यश येईल.

प्रचाराची रणधुमाळी

4155

pracharachirandhumali-1

आमगाव मतदार संघातील काँग्रेसचे उमदवार रामरतनबापू राऊत ङ्मांची देवरी ङ्मेथे निघालेल्ङ्मा रॅलीत सहभागी भरतसिह दुधनाग ङ्मांच्ङ्मासह वरिष्ठ नेते व काँग्रेस,पिरिपा,धनगर समजाचे काङ्र्मकर्ते.

pracharachirandhumali-2
तिरोडा मतदार संघातील काँग्रेसचे उमदवार पी.जी.कटरे सेजगाव ङ्मेथील प्रचार सभेत बोलतांना त्ङ्मांच्ङ्मासोबत जिल्हा बँकेचे उपाध्ङ्मक्ष राधेलाल पटले,मजी जि.प.उपाध्ङ्मक्ष ङ्मोगेंद्र भगत व पदाधिकारी.

pracharachirandhumali-3
अर्जुनी मरगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्ङ्मा उमदावर किरणताई कांबळे ङ्मांच्ङ्मा प्रचाराला वेग आला असून नक्षलग्रस्त गावखेड्यात नुक्कड सभेच्ङ्मा मध्ङ्ममतून महिलांशी सवांद साधून श्रीमती काबंळे विकासाच्ङ्मा मद्यावर शिवसेनेला मतदान करुन विजङ्मी करण्ङ्माचे करीत आहेत.त्ङ्मांच्ङ्मासोबत शिवसेनेचे पदाधिकारी सुध्दा होते.