Daily Archives: Dec 14, 2018
दिवंगत पोलीस उपनिरीक्षक चिडे यांच्या कुटूंबियांना संपूर्ण वेतन व अन्य लाभ मिळणार
BerarTimes - 0
चंद्रपूर,दि.14 : जिल्ह्यातील नागभीड येथे अवैध दारू विक्रेत्यांशी लढा देताना मृत झालेले दिवंगत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसन चिडे यांच्या कुटूंबियांना सेवानिवृत्तीपर्यंत अर्थात वयाच्या 58 वर्षापर्यंत...
फुटबॉल स्पर्धेत नागपूरचे तिन्ही संघ उपांत्य फेरीत
BerarTimes - 0
गोंदिया,दि.१४ः-येथील इंदिरा गांधी स्टेडीयमवर सुरु असलेल्या राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेत बुधवारी सायकांळी प्रथम उपांत्यपुर्व सामन्यात नागपूर फुटबॉल अकादमी संघाने सिटी क्लब गोंदिया संघावर...
सत्तेवर आलो तर सरसंघचालकांना तुरुंगात टाकू : प्रकाश आंबेडकर
BerarTimes - 0
नागपूर,दि.14ः- शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे...
शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांचे निधन
BerarTimes - 0
अमरावती,दि.14 - माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड (54) यांचे गुरुवारी (दि. 13) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर...
अधिकारी, कर्मचारींच्या निवासस्थानांची दुरुस्ती कशासाठी ?
BerarTimes - 0
गोंदिया,(पराग कटरे),दि.14ः- सालेकसा तालुका हा नक्षल दृष्ट्या अतिसंवेदनशील व मागास म्हणून ओळखला जातो. तालुक्याची अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यप्रणालीने अतिशय दयनीय अवस्था झाल्याचे...
दिव्यांग व्यक्तींना सन्मानाची वागणूक द्या-पालकमंत्री संजय राठोड
BerarTimes - 0
वाशिम, दि. १३ : दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक व्यंगावर मात करून स्वावलंबी होण्यासाठी शासनामार्फत विविध योजनांचा लाभ देवून मदत केली जात आहे. त्याचबरोबर त्यांना समाजाकडूनही त्यांना प्रोत्साहन मिळणे...
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना महोत्सवामुळे चालना-पालकमंत्री संजय राठोड
BerarTimes - 0
चाचा नेहरु बाल महोत्सव
वाशिम, दि.14: विद्यार्थ्यांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सव हा आनंदोत्सव आहे. सळसळत्या उर्जेला प्रवाही करण्याचे काम यामधून होत आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्यासुप्त गुणांना चालना देण्यासाठी बाल महोत्सव उपयुक्त आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
13 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री श्री. राठोड यांनीकेले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष जयश्री गुट्टे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हापरिषद सदस्य शालीक राठोड, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांची उपस्थिती होती.
श्री. राठोड बोलतांना पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या उत्सवामधून विद्यार्थ्यांना सांघीक भावनेसह बंधूभावाचे धडे मिळण्यास मदत होते. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते घट्टहोते. विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्याचा पाया शाळेत घातला जातो. विद्यार्थी दशेपासूनच आई वडील, मोठयांचा आदर आणि शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांनी राखला पाहिजे.मुले आज टि.व्ही आणि मोबाईलच्या विश्वात हरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरु यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. चिमुकल्या बालकांनी मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले.यावेळी जिल्हयातील शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल असलेली अनाथ,निराधार, उन्मार्गी तसेच शहरातील अन्य शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येनेउपस्थित होते.
महोत्सवाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले. संचालन राहुल गवई यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा परिविक्षा अधिकारीगजानन जुमळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे अधिक्षक आणि स्थानिक शाळांच्या शिक्षकानी परिश्रमघेतले.
© 2023, BerarTimes