आजचे दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी भावी पिढीचे प्रेरणास्त्रोत- राजे अम्ब्रीशराव आत्राम

0
8

मुंबई, दि १० : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या करत आहे.शासनाच्या विविध योजनांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सहज शक्य होत आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आज येथे केले. मंत्रालयात आयोजित दहावी-बारावीच्या आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात श्री. आत्राम बोलत होते.आदिवासी समाजातील इयत्ता दहावी-बारावीच्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांना श्री. आत्राम यांच्या हस्ते प्रोत्साहनपर प्रमाणपत्र वितरीत
करण्यात आले.